शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ऐन हंगामात बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:37 IST

गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे.

ठळक मुद्दे‘एसटी’चे नुकसान : प्रवाशांचे हाल, कारणांची यादी, गाड्या दुरुस्तीला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सांगून प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. सोबतच महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.लग्नाचा ठोक असल्याने बसस्थानकावर गर्दी असताना फलाट मात्र रिकामे दिसतात. एखादी बस लागताच लोंढेच्या लोंढे त्या दिशेने धावतात. जागा पकडण्यासाठी रेटारेटी सुरू होते. कुठल्याही मार्गावरील बसची हिच स्थिती आहे. तरीही अतिरिक्त तर दूर नियमित फेºयाही कमी धावत आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभ्या राहतात. बसेस असल्या तरी चालक-वाहक नाही म्हणून तर कधी तिकीट मशीनचा तुटवडा सांगून फेऱ्या रद्द केल्या जातात. चालक-वाहकांना आस्थापना विभागात कामगिरी दिली जाते. काही ठिकाणी तर अनावश्यक मनुष्यबळ वापरले जात असल्याची ओरड कामगारांमध्ये आहे. एका व्यक्तीवर भागणारे काम दोघांना सोपविले जाते. उत्पन्न बुडत असताना अशा कामगारांना बसवर कामगिरी का दिली जात नाही, हा प्रश्न आहे. काही कामगारांवर असलेली वरिष्ठांची मर्जी इतरांची मानसिकता खराब ठरण्यास कारणीभूत ठरत आहे. याच कारणातून चालक-वाहक कामगिरी टाळत असल्याचे सांगितले जाते. जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ आगारातूनच याची सुरुवात होते. इतर आगारांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. टाइमपास प्रकारही मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. याला नियंत्रणात आणण्याची आवश्यकता आहे.अतिकालिक भत्त्यावर उधळपट्टीकमी बेसिकच्या कामगारांना अतिकालिक भत्त्याची कामगिरी देण्याचे महामंडळाचे निर्देश आहे. मात्र यवतमाळ विभागात याउलट सुरू आहे. ३०० ते ३१५ रुपये तास एवढा ओटी घेणाऱ्या कामगारांना अतिरिक्त कामगिरी दिली जात आहे. ९० ते २०० रुपये ओटीच्या कामगारांना मागूनही काम दिले जात नाही. काही कामगारांचा ओटी तर त्यांच्या मासिक वेतनापेक्षाही अधिक जातो, हे वास्तव आहे. यवतमाळ आगारात असलेल्या ८५ पैकी ६० ते ६५ बसेसच उपयोगात येतात. राहिलेल्या बसेस विविध कारणांमुळे आगाराची राखण करतात.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ