शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

बालकांच्या ऑनलाईन नोंदणीत अमरावती विभाग शेवटून पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 13:06 IST

लसीकरण हा बाळाच्या संगोपणातला महत्वाचा घटक मानला जातो. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा आणि अत्यंत सोपा मार्ग आहे. मात्र यामध्ये ऑनलाईन नोंदणी खोडा ठरत आहे.

ठळक मुद्देलसीकरणात खोडा राज्याची सरासरी ७४ टक्के, ठाणे ५० वर थबकले

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लसीकरण हा बाळाच्या संगोपणातला महत्वाचा घटक मानला जातो. बालमृत्यू कमी करण्याचा हा एक खात्रीचा आणि अत्यंत सोपा मार्ग आहे. मात्र यामध्ये ऑनलाईन नोंदणी खोडा ठरत आहे. नोंदणी झाली नसलेल्या बालकांचे लसीकरण विस्कळीत होण्याची शक्यता आहे. राज्याची वर्षभरातील सरासरी नोंदणी ७४ टक्के इतकी आहे. यात अमरावती विभाग शेवटून पहिला आहे. माता नोंदणीतही या विभागाची स्थिती अशीच आहे.ऑनलाईन नोंदणी झाल्यास कोणत्या बालकाचे लसीकरण झाले, कोणत्या लसी दिल्या याची माहिती सहज उपलब्ध होते. राहिलेल्या बालकांना बोलावून घेत लसीकरण करता येते. कोणत्या लसीचा स्टॉक करावा लागतो याची कल्पना येते. पालकांकडून ही काळजी घेतली जाते. परंतु साठा नसल्यास पर्याय राहात नाही. यासाठी ऑनलाईन नोंदणी घेतली जाते. मात्र ऑनलाईन नोंदणीची कामे सोपविलेल्या संस्थांच्या कामाची गती अतिशय कमी आहे.१ एप्रिल २०१८ ते ८ एप्रिल २०१९ या कालावधीत ३६ जिल्ह्यात तेरा लाख १७ हजार ५१ बालकांची नोंदणी करायची होती. यातील नऊ लाख ७३ हजार दहा इतकीची नोंदणी करण्यात आली आहे. ही सरासरी ७४ टक्के इतकी आहे. यात सर्वात मागे ठाणे जिल्हा आहे. या जिल्ह्याने केवळ ४८ टक्के एवढाच पल्ला गाठला आहे. त्या पाठोपाठ अमरावती विभाग आहे. या विभागातील यवतमाळ ६२, अमरावती ६५, अकोला व बुलडाणा प्रत्येक ६८ टक्के नोंदणी करण्याच यशस्वी झाला. वाशिमने ८० टक्के नोंदणी करून अमरावती विभागाचा टक्का वाढविण्यात हातभार लावला. नोंदणीची कामे काही ठिकाणी संस्थांना दिली आहे, तर काही ठिकाणी आरोग्य विभागाची यंत्रणा करत आहे.ऑनलाईन नोंदणीची कामे स्थानिक पातळीवर दिली जातात. आरोग्य विभागाकडून मर्जीतल्या संस्थाना कामे दिली जातात. अधिकारी आणि संस्था यांच्यात असलेले चांगले संबंधही नोंदणी कमी होण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. कामे कमी झाल्यास कारवाई अपवादानेच होते. देयकेही कुठलीही शहानिशा न करता काढली जातात. सर्व नियम धाब्यावर बसवून नोंदणीची कामे केली जात आहे. याचा परिणाम बाळाच्या लसीकरणावर होत असल्याचे सांगितले जाते.गोंदिया टॉपवरबाल नोंदणीत ९२ टक्के काम करून गोंदिया जिल्हा टॉपवर आहे. त्या खालोखाल नांदेड, धुळे, नाशिक, लातूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ८१ ते ८७ टक्केपर्यंत नोंदणी याठिकाणी झाली आहे. उर्वरित जिल्हे ८० टक्केच्या खाली आहे. त्यात अमरावती विभाग सर्वात शेवटी आहे. नोंदणी झाली नसलेली बालके क्षयरोग प्रतिबंधक लस, त्रिगुणी लस, पोलिओ प्रतिबंधक लस, गोवरची लस, काविळची लस यापासून वंचित राहण्याची भीती आहे.

टॅग्स :Healthआरोग्य