शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

अर्धी दिवाळी उलटली तरी अनेकांना मिळाली नाही रवा, डाळ, साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 20:56 IST

अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी गोरगरिबांच्या घरात पाेहोचेल, असा विश्वास व्यक्त केला होता. घोषणा झाली मात्र वस्तूंचा पुरवठा झालाच नाही. अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.जिल्ह्याला आणखी साखरेच्या दोन लाख ४२ हजार ९०६ कीट, रव्याच्या तीन लाख १९ हजार ९६१ कीट, चणा डाळीच्या तीन लाख १६ हजार ९०० कीट, पामतेलाच्या ३५ हजार ८७७ कीट, तर रिकाम्या ४१ हजार पिशव्या आवश्यक आहे. या साहित्याला प्राप्त करण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.

दुकानदाराच्या तोंडाला फेस१०० रुपयांची कीट घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा असल्या तरी मोजक्याच ग्राहकांना या वस्तू मिळणार असल्याने इतर ग्राहकांकडून दुकानदार टार्गेट झाले.

चार केंद्रांवर पूर्ण माल पोहोचलाचार कीट पैकी एकही वस्तू उपलब्ध झाली असेल तर ती तत्काळ वितरित करा, अशा सूचना असल्याने पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील कळंब, मारेगाव, शेंबाळपिंपरी आणि ढाणकी केंद्रावर कीटमधील काही वस्तू पूर्णत: पोहोचल्या.

दिवाळीनंतर    मिळणार कीट५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना ही कीट मिळाली असली तरी अजूनही अर्ध्यापेक्षा अधिक ग्राहक कीट मिळावी म्हणून प्रतीक्षा करीत आहे. मात्र, कीट पोहोचण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहे. यामुळे दिवाळी झाल्यानंतरच ही कीट अनेक गावांमध्ये पोहोचेल, अशी स्थिती आहे. यातून ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.

लाभार्थी काय म्हणतात...

आम्हाला दिवाळीनंतर कीट मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग हे समजलेच नाही. आमची दिवाळी अंधारात गेली आहे. नियोजन नसल्याने सर्वसामान्यांची शोभा सरकारकडून झाली आहे.- मंगला गेडाम, लाभार्थी

अनेक येरझारा मारल्यानंतरही दुकानदारांकडून साहित्य आलेच नसल्याचे सांगितले गेले. सरकारने घोषणा केली नसती तर त्याचे वाईटही वाटले नसते. मात्र, केवळ दिखावा झाला आहे.- संजय आत्राम, लाभार्थी

शेवटच्या ग्राहकापर्यंत वाटपप्रत्येकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. शेवटच्या ग्राहकापर्यंत याचे वाटप होणार आहे. पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याने हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, कुणीही वंचित राहणार नाही. याची संपूर्ण खबरदारी घेतल्या गेली आहे.- सुधाकर पवार,जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाDiwaliदिवाळी 2022