शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

अर्धी दिवाळी उलटली तरी अनेकांना मिळाली नाही रवा, डाळ, साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 20:56 IST

अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी गोरगरिबांच्या घरात पाेहोचेल, असा विश्वास व्यक्त केला होता. घोषणा झाली मात्र वस्तूंचा पुरवठा झालाच नाही. अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.जिल्ह्याला आणखी साखरेच्या दोन लाख ४२ हजार ९०६ कीट, रव्याच्या तीन लाख १९ हजार ९६१ कीट, चणा डाळीच्या तीन लाख १६ हजार ९०० कीट, पामतेलाच्या ३५ हजार ८७७ कीट, तर रिकाम्या ४१ हजार पिशव्या आवश्यक आहे. या साहित्याला प्राप्त करण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.

दुकानदाराच्या तोंडाला फेस१०० रुपयांची कीट घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा असल्या तरी मोजक्याच ग्राहकांना या वस्तू मिळणार असल्याने इतर ग्राहकांकडून दुकानदार टार्गेट झाले.

चार केंद्रांवर पूर्ण माल पोहोचलाचार कीट पैकी एकही वस्तू उपलब्ध झाली असेल तर ती तत्काळ वितरित करा, अशा सूचना असल्याने पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील कळंब, मारेगाव, शेंबाळपिंपरी आणि ढाणकी केंद्रावर कीटमधील काही वस्तू पूर्णत: पोहोचल्या.

दिवाळीनंतर    मिळणार कीट५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना ही कीट मिळाली असली तरी अजूनही अर्ध्यापेक्षा अधिक ग्राहक कीट मिळावी म्हणून प्रतीक्षा करीत आहे. मात्र, कीट पोहोचण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहे. यामुळे दिवाळी झाल्यानंतरच ही कीट अनेक गावांमध्ये पोहोचेल, अशी स्थिती आहे. यातून ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.

लाभार्थी काय म्हणतात...

आम्हाला दिवाळीनंतर कीट मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग हे समजलेच नाही. आमची दिवाळी अंधारात गेली आहे. नियोजन नसल्याने सर्वसामान्यांची शोभा सरकारकडून झाली आहे.- मंगला गेडाम, लाभार्थी

अनेक येरझारा मारल्यानंतरही दुकानदारांकडून साहित्य आलेच नसल्याचे सांगितले गेले. सरकारने घोषणा केली नसती तर त्याचे वाईटही वाटले नसते. मात्र, केवळ दिखावा झाला आहे.- संजय आत्राम, लाभार्थी

शेवटच्या ग्राहकापर्यंत वाटपप्रत्येकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. शेवटच्या ग्राहकापर्यंत याचे वाटप होणार आहे. पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याने हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, कुणीही वंचित राहणार नाही. याची संपूर्ण खबरदारी घेतल्या गेली आहे.- सुधाकर पवार,जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाDiwaliदिवाळी 2022