शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

अर्धी दिवाळी उलटली तरी अनेकांना मिळाली नाही रवा, डाळ, साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2022 20:56 IST

अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी गोरगरिबांच्या घरात पाेहोचेल, असा विश्वास व्यक्त केला होता. घोषणा झाली मात्र वस्तूंचा पुरवठा झालाच नाही. अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.जिल्ह्याला आणखी साखरेच्या दोन लाख ४२ हजार ९०६ कीट, रव्याच्या तीन लाख १९ हजार ९६१ कीट, चणा डाळीच्या तीन लाख १६ हजार ९०० कीट, पामतेलाच्या ३५ हजार ८७७ कीट, तर रिकाम्या ४१ हजार पिशव्या आवश्यक आहे. या साहित्याला प्राप्त करण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.

दुकानदाराच्या तोंडाला फेस१०० रुपयांची कीट घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा असल्या तरी मोजक्याच ग्राहकांना या वस्तू मिळणार असल्याने इतर ग्राहकांकडून दुकानदार टार्गेट झाले.

चार केंद्रांवर पूर्ण माल पोहोचलाचार कीट पैकी एकही वस्तू उपलब्ध झाली असेल तर ती तत्काळ वितरित करा, अशा सूचना असल्याने पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील कळंब, मारेगाव, शेंबाळपिंपरी आणि ढाणकी केंद्रावर कीटमधील काही वस्तू पूर्णत: पोहोचल्या.

दिवाळीनंतर    मिळणार कीट५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना ही कीट मिळाली असली तरी अजूनही अर्ध्यापेक्षा अधिक ग्राहक कीट मिळावी म्हणून प्रतीक्षा करीत आहे. मात्र, कीट पोहोचण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहे. यामुळे दिवाळी झाल्यानंतरच ही कीट अनेक गावांमध्ये पोहोचेल, अशी स्थिती आहे. यातून ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.

लाभार्थी काय म्हणतात...

आम्हाला दिवाळीनंतर कीट मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग हे समजलेच नाही. आमची दिवाळी अंधारात गेली आहे. नियोजन नसल्याने सर्वसामान्यांची शोभा सरकारकडून झाली आहे.- मंगला गेडाम, लाभार्थी

अनेक येरझारा मारल्यानंतरही दुकानदारांकडून साहित्य आलेच नसल्याचे सांगितले गेले. सरकारने घोषणा केली नसती तर त्याचे वाईटही वाटले नसते. मात्र, केवळ दिखावा झाला आहे.- संजय आत्राम, लाभार्थी

शेवटच्या ग्राहकापर्यंत वाटपप्रत्येकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. शेवटच्या ग्राहकापर्यंत याचे वाटप होणार आहे. पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याने हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, कुणीही वंचित राहणार नाही. याची संपूर्ण खबरदारी घेतल्या गेली आहे.- सुधाकर पवार,जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाDiwaliदिवाळी 2022