जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरप्रकाराचा आरोप
By Admin | Updated: May 31, 2015 02:16 IST2015-05-31T02:16:41+5:302015-05-31T02:16:41+5:30
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या कामात

जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरप्रकाराचा आरोप
दारव्हा : पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहे. कामाचा दर्जा व तांत्रिक दृष्ट्या योग्य होत आहे की नाही या बाबत शंका व्यक्त केल्या जात असून करोडो रुपये खर्च करून खरोखरच पाणीटंचाईवर मात करता येईल का, असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
झटपट व सोपे काम आणि मार्जीन जास्त यामुळे बहुतांश ठिकाणी राजकीय नेत्यांनी ही कामे घेतली आहे. त्यामुळे मन मानेल तसा कारभार सुरू आहे. काहीही झालं तरी अधिकारी कर्मचाऱ्यांचा टक्का सेफ आहे. त्यांच सहकार्य मिळत असल्यामुळे संगनमताने सगळा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
सर्वासाठी पाणीटंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दारव्हा तालुक्यातील ३६ गावांची पहिल्या टप्प्याकरिता निवड करण्यात आली होती. त्यानुसार या गावांमध्ये नाला सरळीकरण, ढाळीचे बांध, शेततळे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, सिमेंट प्लग बंधारे आदी कामे करण्याकरिता नोंदणी केलेल्या जेसीबी मशीनधारक व कंत्राटदारांना कृषी विभाग, सिंचन विभागाकडून कामाचे वाटप करण्यात आले.
निवड ३६ गावांची झाली असली तरी प्रत्यक्षात कामे मात्र किन्ही वळगी, लाडखेड, कोलवाई, नांदगव्हाण, तेलगव्हाण, बागापूर, तेलधरी, चोपडी, धामणगाव, हातोला, ब्रह्मी, कुऱ्हाड (बु), बागवाडी, हुसनापूर, गोरेगाव, डोल्हारी (देवी), जवळा, लाखखिंड, गोंडेगाव व पिंपळखुटा या २० गावांमध्ये करण्यात येत आहे. त्यातही ज्या नोंदणीकृत मशीनधारकांच्या नावे कामे आहेत ते कामावर दिसत नाही तर त्यांच्याऐवजी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी च कामे करीत असल्याचे दिसून येते. खरे ठेकेदार पुढारीच असल्याचे सिद्ध होते. कोणत्याही कामावर टेक्निकल हॅन्ड दिसत नाही. केवळ जेसीबी मशीन आॅपरेटरच्या भरवशावर काम सुरू आहे. त्यामुळे काम तांत्रिकदृष्ट्या तर बरोबर नाहीच. शिवाय कामाचा दर्जाही चांगला नसल्यामुळे बंधारे किती दिवस टिकेल, शेततळे, नाला खोलीकरण, सरळीकरण याचा उपयोग पाणी साठविण्यासाठी होईल की नाही या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहे.
अनेक गावातील कामे अतिशय शीघ्र गतीने करण्यात येत आहे. कामाची एमबी रेकॉर्ड करताना त्यामध्ये मोठे घापले करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहे. कमी कामाचे जास्त मोजमाप दाखवून बिल काढण्याा सपाटा सुरू आहे. धामणगाव (देव) येथे असाच प्रकार उघडकीस आल्यानंतर एमबीमध्ये जास्त दाखविण्यात आलेल्या मोजमापाएवढे काम नंतर करावयास लावण्यात आले. एवढ सगळ खुलेआमपणे सुरू असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र एकाही कामावर कारवाई केलेली नाही. त्यांना कामातील त्रुट्या दिसत नाही की जाणिवपूर्वक डोळेझाक करण्यात येत आहे. या बाबत शंका उपस्थित होत आहे. त्यांचा टक्का सेफ असल्यामुळे संगनमताने गैरप्रकार सुरू असून चांगल्या कामाची वाट लावल्या जात असल्याचा आरोप होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)
राजकीय पदाधिकारीच बनले ठेकेदार
ज्या नोंदणीकृत मशीनधारकांच्या नावे कामे आहेत ते कामावर दिसत नाही तर त्यांच्याऐवजी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधीच ही कामे करीत आहेत. खरे ठेकेदार पुढारीच असल्याचे सिद्ध होते. कोणत्याही कामावर टेक्निकल हॅन्ड दिसत नाही. केवळ जेसीबी मशीन आॅपरेटरच्या भरवशावर काम सुरू आहे. त्यामुळे काम तांत्रिकदृष्ट्या तर बरोबर नाहीच. राजकीय पुढारी किंवा त्यांचे माणसे मलिदा लाटत असले तरी कामाच्या दर्जासाठी प्रत्यक्षात घटनास्थळी ते थांबत नाहीत, केवळ माणसोमाणसी कारभार सुरू असल्याने शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचे तीन-तेरा वाजले आहे.