अशोक उईके : बाभूळगाव येथे तीन दिवस विविध कार्यक्रमबाभूळगाव : पुढील वर्षाची धम्म परिषद मोठ्या प्रमाणात घेण्यात यावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिली. परिषदेचा समारोप शनिवारी सायंकाळी झाला. यावेळी ते बोलत होते. बेंबळा प्रकल्पग्रस्तांच्या १८ नागरी सुविधांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती गठित करण्यात आली. अनेक धक्कादायक बाबी उघड होतील, असे आमदार उईके यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी आमदार जोगेंद्र कवाडे अध्यक्षस्थानाहून म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९५६ मध्ये धम्माची दीक्षा घेताना २२ प्रतिज्ञा (आदेश) दिले. त्यांनी या देशाची एकता, अखंडता कायम राहावी, हा देश शाबुत राहावा म्हणून प्रयत्न केले. मात्र काही लोक हा देश तोडू पाहात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष चुडामण मदारे, कृष्णा रंगारी, विजय डांगे, नितीन परडखे, डॉ. मुकुंद दंदे, संजय गावंडे, बेंबळा प्रकल्पाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गायकवाड, आशीष दिघाडे, आर.बी. देशमुख, डॉ. बबन बोबले, बाबाराव अलोणे, ठाकरे, उईके, मडावी, नईमुल्ला, पराग पिसे, सुरेश कोडापे, अर्चनाताई कोडापे, ताई पिसे आदी उपस्थित होते. धम्मध्वज दिनानिमित्त ७ ते ९ जानेवारीदरम्यान आयोजित धम्म परिषदेत विविध कार्यक्रम पार पडले. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन दिलीप वाघमारे यांनी तर आभार भारत दातार यांनी मानले. यावेळी धर्मपाल माने, सुधाकर गडलिंग, राहुल विहिरे, दिनेश माहुरे, सिद्धार्थ दातार, उत्तमराव मनवर, भारत कावडकर, प्रियंका दहाट, राजू पाटील, ललिता मनवर, रूचिका पिसे, सोनल विहिरे, गोपाल घोटी, संजय गावंडे, विनायकराव माहुरे, गौतम लांडगे, पराग पिसे, महादेव वासे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
धम्म परिषदेला सर्वतोपरी सहकार्य
By admin | Updated: January 10, 2015 23:03 IST