शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर २० हंगामी वसतिगृहांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:07 IST

रोजमजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण सुटू नये म्हणून जिल्हा परिषदेने २० हंगामी वसतिगृहांचे प्रस्ताव अखेर मंजूर केले आहेत. सध्या नातेवाईकांचा आसरा घेऊन आईवडिलांविना गावात राहत असलेल्या या शेकडो मुलांना आता शाळेतच जेवणाची सोय होणार आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या मुलांना दिलासा : दीड हजार विद्यार्थ्यांना दररोज मिळणार जेवण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रोजमजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण सुटू नये म्हणून जिल्हा परिषदेने २० हंगामी वसतिगृहांचे प्रस्ताव अखेर मंजूर केले आहेत. सध्या नातेवाईकांचा आसरा घेऊन आईवडिलांविना गावात राहत असलेल्या या शेकडो मुलांना आता शाळेतच जेवणाची सोय होणार आहे.पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यांमधील हजारो मजूर कुटुंबे दरवर्षी उसतोडणी व इतर रोजगारासाठी परजिल्ह्यात जातात. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही स्थलांतरित झाल्यास मुलांचे शिक्षण मध्येच तुटते. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पटावरही विपरित परिणाम होतो. ही बाब टाळण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद दरवर्षी शाळांमध्ये हंगामी वसतिगृह चालविण्यासाठी सहा महिन्यांची परवानगी देते. यंदा परवानगीला विलंब झाला. त्यानंतर जिल्हा परिषदेने शाळांकडून वसतिगृह चालविण्यासाठी प्रस्ताव मागविले. २० शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले असून या प्रस्तावांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली आहे.या वसतिगृहांमध्ये तब्बल १ हजार ४५४ विद्यार्थ्यांच्या दररोजच्या जेवणाची सोय होणार आहे. वसतिगृह चालविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रती विद्यार्थ्यासाठी ८ हजार ५०० रुपयांचा निधी सहा महिन्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मिळविण्यासाठी वसतिगृहात बायोमेट्रिक हजेरी ठेवावी लागणार आहे. मात्र, ही वसतिगृहे यंदा अनिवासी स्वरुपाची असल्याने निवासाची सोय मुलांना पूर्वीप्रमाणेच ओळखीच्या शेजाऱ्यांकडे किंवा गावातील नातेवाईकांकडेच करावी लागणार आहे.पुसदमध्ये सर्वाधिक, दिग्रसमध्ये एकचज्या गावांमधील बहुतांश मजूर स्थलांतरित होतात, तेथे शाळेकडूनच सर्वे केला गेला. त्यानुसारच हंगामी वसतिगृहांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला व तेथून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला पाठविले गेले. त्यानुसार यंदा जिल्ह्यात २० वसतिगृहे मंजूर करण्यात आली. त्यात पुसद तालुक्यात सर्वाधिक ९, उमरखेड तालुक्यात ६ तर महागाव तालुक्यातील ४ जिल्हा परिषद शाळांमध्ये हंगामी वसतिगृहांना मंजुरी मिळाली. मात्र, दिग्रस तालुक्यात केवळ एका वसतिगृहाला मंजुरी मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण