शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

गावातल्या काॅलेजमध्ये ॲडमिशन, अन् शहरातल्या कोचिंगमध्येच हजेरी !

By अविनाश साबापुरे | Updated: June 21, 2024 20:48 IST

आता बस्स झाले..! : शिक्षणाधिकाऱ्यांनी महाविद्यालयांना दिली कारवाईची तंबी

अविनाश साबापुरे/यवतमाळ: एखाद्या खेड्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला नाममात्र ॲडमिशन घ्यायची आणि शहरातल्या खासगी कोचिंग क्लासला हजेरी लावायची, हा प्रकार सर्रास सुरू आहे. या माध्यमातून कोचिंगसोबतच महाविद्यालयांनीही ‘दुकानदारी’ सुरु केली आहे. परंतु, आता या प्रकाराची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे झाली आहे. त्यामुळे यंदा असा प्रकार आढळल्यास कठोर कारवाईची तंबी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दहावी उत्तीर्ण झाल्याबरोबर पुणे, नागपूर, अमरावती, लातूर, नांदेड अशा शहरांमध्ये कोचिंग क्लासेसला प्रवेश घेतले जात आहेत. परंतु, जिल्ह्यातील एखाद्या खेडेगावातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीला नाममात्र प्रवेश घेऊन ठेवला जातो. संबंधित विद्यार्थी या महाविद्यालयात थेट परीक्षेलाच उगवतो. परंतु, त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मात्र परिणाम होत आहे. त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाला कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.या गंभीर बाबीची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. जयश्री राऊत यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना हा प्रकार टाळण्याची तंबी दिली. यंदा अकरावी-बारावीच्या वर्गात कोणीही नाममात्र ॲडमिशन घेऊन गैरहजर आढळल्यास थेट महाविद्यालयावरच कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महाविद्यालयांच्या दुकानदारीला चापपटसंख्या टिकविण्यासाठी अनेक महाविद्यालये अकराव्या वर्गात काही विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार नाममात्र प्रवेश देतात. त्याला वर्षभर गैरहजर राहण्याची मुभा देतात. त्यात विद्यार्थ्यांचे पालकही प्रवेश फीपेक्षा जास्त पैसे मोजायला तयार असतात. मात्र आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार झाल्याने यंदा महाविद्यालयांच्या या दुकानदारीला चाप बसण्याची शक्यता आहे.

गावातल्या विद्यार्थ्यांना डावलू नकामोठ्या शहरात जाऊन कोचिंग क्लास लावण्यासोबतच अकरावीही करता यावी, याकरिता अनेक विद्यार्थी तालुका पातळीवरील किंवा एखद्या मोठ्या खेड्यातील कनिष्ठ महाविद्यालयात ॲडमिशन घेतात. अशा ‘नाममात्र’ विद्यार्थ्यांना खेडेगावातील कनिष्ठ महाविद्यालयेही आवर्जुन प्रवेश देतात. त्यासाठी गावातल्या स्थानिक विद्यार्थ्यांना ‘प्रवेश फुल्ल’ झाल्याचे सांगतात. त्यामुळे खेड्यातल्या गरजू विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव जिल्ह्याच्या ठिकाणी रोज ‘अप-डाउन’ करावे लागते. परंतु आता गावातल्या विद्यार्थ्याला डावलून बाहेरगावच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन देणाऱ्या काॅलेजवर कारवाई केली जाणार आहे.

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयYavatmalयवतमाळ