शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

कळंब येथील भोजन सेवेची प्रशासकीय दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे यशस्वी काम सुरू ठेवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील चिंतामणी देवस्थान गरजुंसाठी अन्नछत्रालय ठरले आहे. भुकेल्यांची भूक शमविण्याचे कार्य देवस्थान प्रशासन चोखपणे सांभाळत आहे. या कार्याची दखल लोकप्रतिनिधीच नव्हे तर, प्रशासकीय स्तरावरुनही घेतली असून कौतुकाची थाप मिळाली आहे.चिंतामणी देवस्थानच्या पुढाकारात २८ मार्चपासून गरजूंना नियमित घरपोच भोजन पुरविले जात आहे. दररोज ८०० लोकांच्या भोजनापासून झालेली सुरुवात आता एक हजार ३०० लोकांपर्यंत पोहोचली आहे. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी भोजनकक्षात भेट देऊन भोजन कसे तयार केले जाते. त्याचे पॅकींग कसे होते, याची संपूर्ण माहीती घेतली. यावेळी तहसीलदार सुभाष जाधव, ठाणेदार विजय राठोड, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव श्याम केवटे, मुख्याधिकारी नंदु परळकर आदी उपस्थित होते.लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे यशस्वी काम सुरू ठेवले आहे.नागपूरच्या आमदाराकडून कौतुकचिंतामणी मंदिराच्या कार्याची दखल नागपूरचे आमदार गिरीष व्यास यांनी घेतली. त्यांनी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांच्याशी संपर्क साधून लोकांना कशापध्दतीने जेवन पुरविले जाते यांची सविस्तर माहीती घेतली.

टॅग्स :Socialसामाजिक