लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील चिंतामणी देवस्थान गरजुंसाठी अन्नछत्रालय ठरले आहे. भुकेल्यांची भूक शमविण्याचे कार्य देवस्थान प्रशासन चोखपणे सांभाळत आहे. या कार्याची दखल लोकप्रतिनिधीच नव्हे तर, प्रशासकीय स्तरावरुनही घेतली असून कौतुकाची थाप मिळाली आहे.चिंतामणी देवस्थानच्या पुढाकारात २८ मार्चपासून गरजूंना नियमित घरपोच भोजन पुरविले जात आहे. दररोज ८०० लोकांच्या भोजनापासून झालेली सुरुवात आता एक हजार ३०० लोकांपर्यंत पोहोचली आहे. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी भोजनकक्षात भेट देऊन भोजन कसे तयार केले जाते. त्याचे पॅकींग कसे होते, याची संपूर्ण माहीती घेतली. यावेळी तहसीलदार सुभाष जाधव, ठाणेदार विजय राठोड, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव श्याम केवटे, मुख्याधिकारी नंदु परळकर आदी उपस्थित होते.लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे यशस्वी काम सुरू ठेवले आहे.नागपूरच्या आमदाराकडून कौतुकचिंतामणी मंदिराच्या कार्याची दखल नागपूरचे आमदार गिरीष व्यास यांनी घेतली. त्यांनी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांच्याशी संपर्क साधून लोकांना कशापध्दतीने जेवन पुरविले जाते यांची सविस्तर माहीती घेतली.
कळंब येथील भोजन सेवेची प्रशासकीय दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST