शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

यवतमाळ जिल्ह्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी महिलांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:53 IST

40 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई

यवतमाळ : मे महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. पुसद तालुक्यातील माळपठार परिसरात पाण्यासाठी महिला व नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. ४० गावांमध्ये तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. पुसद तालुक्यातील माळपठार परिसराला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. या परिसरातील हिवळणी, कुंभारी, आपटी, मासळी, पन्हाळा, म्हैसमाळ या भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहे. काही ठिकाणी टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. ते पाणी उपसण्यासाठी विहिरीवर प्रचंड गर्दी होत आहे. गावांमध्ये पाण्यासाठी भांडणे होत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईमुळे सध्या २३ टँकर सुरू झाले आहे. माळपठार परिसरातील म्हैसमाळ येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकर चालकाची मनमानी सुरू असल्याने महिलांना रात्री-अपरात्री पाणी भरावे लागत आहे. या गावात दररोज दोन टँकर येतात. त्यापैकी एक दिवसा तर दुसरा टँकर रात्री येतो. पन्हाळा येथील विहिरी कोरड्या पडल्या. कुंभारी येथील विहिरी आटल्याने नागरिकांना कूपनलिकेचे फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे करावे लागत आहे. या परिसरातील ४० गावांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईYavatmalयवतमाळ