शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

यवतमाळ जिल्ह्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी महिलांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 16:53 IST

40 गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई

यवतमाळ : मे महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात पाणीटंचाईचा भडका उडाला आहे. पुसद तालुक्यातील माळपठार परिसरात पाण्यासाठी महिला व नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. ४० गावांमध्ये तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. पुसद तालुक्यातील माळपठार परिसराला दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. या परिसरातील हिवळणी, कुंभारी, आपटी, मासळी, पन्हाळा, म्हैसमाळ या भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहे. काही ठिकाणी टँकरचे पाणी विहिरीत टाकले जाते. ते पाणी उपसण्यासाठी विहिरीवर प्रचंड गर्दी होत आहे. गावांमध्ये पाण्यासाठी भांडणे होत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईमुळे सध्या २३ टँकर सुरू झाले आहे. माळपठार परिसरातील म्हैसमाळ येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकर चालकाची मनमानी सुरू असल्याने महिलांना रात्री-अपरात्री पाणी भरावे लागत आहे. या गावात दररोज दोन टँकर येतात. त्यापैकी एक दिवसा तर दुसरा टँकर रात्री येतो. पन्हाळा येथील विहिरी कोरड्या पडल्या. कुंभारी येथील विहिरी आटल्याने नागरिकांना कूपनलिकेचे फ्लोराईडयुक्त पाणी प्यावे करावे लागत आहे. या परिसरातील ४० गावांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईYavatmalयवतमाळ