शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

मारेगावात नियम न पाळल्यानेच वाढताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM

शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक शाखेच्या कारवाईची गरज, मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले

देवेंद्र पोल्हे ।लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहरातील रस्त्यांवर व ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. या वाहनचालकांत अप्रशिक्षीत अल्पवयीन मुले, मद्यपी आणी ंविनापरवानाधारक यांचा सहभाग मोठा आहे. मद्यपान करून वेगात वाहने चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे, अशा वाहनचालकांवर आवश्यक त्या प्रमाणात कार्यवाही होत नसल्याने वाहतुकीचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रमाण वाढले आहे.शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे. वणी उपविभागात मारेगाव तालुक्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. सातत्याने अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहेत. बºयाच अपघातात मद्यपान करून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणे, ही कारणे सातत्याने समोर येत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर दिवसभर शहरात पदोपदी वाहतूक नियम तोडले जात आहेत. अपघात घडून मृत्यू झाल्यावर यंत्रणेपासून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. परंतु अपघाताची जबाबदारी कोणीच स्विकारायला तयार नाही. वाहनधारकांना आणि नागरिकांना यंत्रणेला दोष देऊन प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसऱ्यांवर झटकत असल्याचे चित्र मारेगावात पहायला मिळते.कारवाईत सातत्य नाहीवाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरूद्ध सातत्याने कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यवाहीचे सोपस्कार पार पाडले जाते. त्यामुळे रस्त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस एखादेवेळी कार्यवाही करताना दिसतात. त्यावेळी रोडच्या दोनही बाजुला कार्यवाहीच्या भितीने वाहनचालकांच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांनाही जबाबदारीची जाणिव नाही. वाहने वाहतुकीचे नियम सांभाळून चालविल्यास निम्म्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परंतु नागरिक मात्र एवढी तसदी घेण्यासही तयार नसल्याचे दिसून येते. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.पोलिसांचे आवाहनआपल्या वाहनामुळे अपघात घडेल, असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. अल्पवयीन व परवाना नसलेल्या मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नये, मद्यपान करून वाहने चालवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तालुक्यात अपघात घडल्यास कारणीभूत ठरणाºयाविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Accidentअपघात