शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चंद्रपूरवरून बुलडाणा येथे मजूर घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात; एक ठार, दोन जण गंभीर

By सुरेंद्र राऊत | Updated: September 28, 2022 17:49 IST

चालकाचे नियंत्रण सुटले : बाभूळगाव-कळंब मार्गावरील घटना

बाभूळगाव (यवतमाळ) : अनियंत्रित झालेले वाहन कठडे तोडून पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर २६ जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजता बाभूळगाव-कळंब मार्गावरील नायगाव येथे घडली. जखमींवर यवतमाळ येथे उपचार केले जात आहे.

चंद्रपूर येथील ३० मजुरांना घेऊन पिकअप व्हॅन बुलडाणा येथे निघाली होती. कळंब मार्गे बाभूळगावकडे येत असताना नायगाव पुलावर पिकअप व्हॅन अनियंत्रित झाली. रस्त्याने चालत निघालेल्या तीन जणांना या व्हॅनने जोरदार धडक दिली. यानंतर हे वाहन ३० मजुरांसह पुलाचा लोखंडी कठडा तोडून खाली कोसळले. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर, जखमींपैकी दोघे गंभीर आहेत. 

यदु मोतीराम जाधव (५५) नायगाव असे अपघातातमृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, ममता सुभाष मेश्राम, रमेश सखाराम कांबळे (४५) सुवर्णा विनायक लोनबले  (34), जोस्ना हेमराज हजारे (३०), ममता सुधाकर मेश्राम (३५), सुषमा दिनेश  मेश्राम (३५), शालू गुरुदास जराते (३५), हेमराज मनोहर हजारे (३५), विनायक बापूजी लोनवले (35), डाकराम केवलराम बोरसे (३५), मोरेश्वर कालिदास गेडाम (३५), जयश्री यादव लोनवले (३०), निराशा हेमंत मडावी (३०), अशी जखमींची नावे आहेत.

घटना घडताच नायगाव येथील नागरिक मदतीला धावले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठाणेदार रवींद्र जेधे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, पोलीस कर्मचारी व होमगार्डचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मिळेल त्या वाहनाने आणि येथील ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्बुलन्सद्वारे सर्व जखमींना यवतमाळ येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूYavatmalयवतमाळ