शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

राज्यातील ३० लाख पात्र शेतकरी दोन वर्षांनंतरही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 07:16 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास २४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली.

- रुपेश उत्तरवारयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास २४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. आतापर्यंत मात्र फक्त २० लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला, तर ३० लाख पात्र शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित राहिले असल्याचे चित्र आहे.२०१७ मध्ये युती सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. बँकांकडूनही अहवाल मागविला. अर्ज व अहवाल यातील माहितीत तफावत होती.या त्रुटी दुरुस्त करण्याचे काम अजूनही पूर्ण न झाल्याने कर्जमाफीची प्रक्रिया रेंगाळली आहे. दोन वर्षांनंतरही पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. आता तालुका पातळीवर कर्जमाफीस मुकलेल्या शेतकºयांच्या अर्जाची छाननी सहायक निबंधकांच्या समितीमार्फत करण्यात येत आहे. त्यानंतर, ग्रीनलिस्ट जाहीर होणार आहे. या योजनेत दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असणारे शेतकरी वरची रक्कम भरल्यावर पात्र ठरणार आहेत. अशांंची संख्या मोठी आहे. दुष्काळी स्थितीत ही रक्कम कुठून भरावी, हा शेतकºयांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे वनटाइम सेटलमेंट योजनेत आपण पात्र ठरणार की नाही, असा संभ्रमही आहे.पुनर्गठणाने वाढविला पेचकर्जमाफीच्या प्रक्रियेत अनेक शेतकरी पुनर्गठणामुळेही अडचणीत आले आहेत.२०१५ पूर्वी या शेतकºयांनी कर्ज उचलले. मात्र, पुनर्गठणाचे हप्ते यानंतर पाच वर्षांत फेडायचे आहेत. असे कर्ज दीड लाखांच्या आत असले, तरी ठरावीक वर्षापर्यंतच ही कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे असे शेतकरी कर्जमाफीनंतरही थकबाकीदार राहण्याची शक्यता आहे.‘डेडलाइन’ही हुकली!कर्जमाफीची योजना जाहीर करताना सरकारने प्रारंभी पेरणीपूर्वी कर्जमाफी होईल, असे सांगितले. नंतर नरक चतुर्दशीपूर्वीचा मुहूर्त काढण्यात आला, परंतु हब सेंटरचा घोळ झाला आणि ग्रीनलिस्टची गतीच मंदावली. आज दोन वर्षे लोटूनही अनेक पात्र शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेपासून दूरच राहिले आहेत.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी