शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

आंदोलन, परतीचा पाऊस अन् घसरलेले दर..; यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

By रूपेश उत्तरवार | Updated: October 13, 2022 18:18 IST

संकटांची मालिका संपणार कधी?

यवतमाळ :शेतकरी आणि संकटांची मालिका एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,असे म्हणण्याची वेळ यावर्षी शेतकऱ्यांवर आली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेली संकटांची मालिका ऑक्टोबर महिना आला तरी पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन आणि शेतमालाच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांपुढील संकटांच्या मालिकांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.

दिवसेंदिवस शेतीचे गणित बिकट होत आहे. निसर्ग प्रकोप आणि वाढत्या महागाईने शेतकरी बेजार झाले आहेत. त्यातच शेतमालाचे दर घसरल्याने हवालदिल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी सात हजार रुपयेे क्विंटल असलेले सोयाबीनचे दर आता ४४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कापसाचे दरही असेच गडगडले आहेत.

यावर्षी १४ हजार रुपये क्विंटल दर कापसाला मिळेल,अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात कापसाचे दर आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहे. कळंबमध्ये कापसाच्या शुभारंभाला हे दर मिळाले आहेत. यामध्ये पूर्वीच्या दराच्या तुलनेत निम्मी घट नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे दिवाळे

शेतमालाचे दर पाहून शेतकऱ्यांची हिम्मत वाढली होती. त्यामुळे त्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. खते,बियाणे, कीटकनाशकांच्या किमती वधारल्या असतानाही शेतकऱ्यांनी चालढकल केली नाही. सोयाबीनला मिळालेल्या दराने बियाणे कंपन्यांनी बॅगचे दर वाढविले. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मजुरी दरावर ही झाला. सोयाबीनची बॅग काढण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपयांचा दर आहे. त्यात सोयाबीन किती निघेल याचा अंदाज नाही.

बोनस दिला तरच शेतकरी तरतील

खर्च आणि नैसर्गिक आपत्ती पाहता कापूस दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस हवा आहे. साखर निर्यातीला सबसिडी मिळते. मात्र,सोयाबीन निर्यातीला सरकार सबसिडी देत नाही. कापसाच्या निर्यातीला सबसिडी हवी,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

विनामूल्य आयात धोरणाचा फटका

सोयाबीन आणि सोयापेंडचे विनामूल्य आयात धोरण शेतकऱ्यांना महागात पडले आहे. महागाई कमी करण्याच्या नावाखाली आयात होत आहे. त्याचा फटका थेट शेतमालावर पडत आहे. दरात घसरण झाली आहे. राज्यात सोयाबीनचे उत्पन्न घटणार असले तरी इतर ठिकाणी उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रारंभी सोयाबीनचा दर दबावात राहणार आहे. मात्र,नंतरच्या काळात दर वाढण्याचा अंदाज आहे.

जागतिक बाजारात कापसाचे दर उतरले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६० ते ६५ हजार रुपये खंडीचे दर आहेत. गतवर्षी एक लाख रुपये खंडीपर्यंत रुईचे दर होते. गतवर्षी एक्सपोर्ट झाले. सोयाबीनची ढेप आयात झाली नाही. सोयाबीन इंडस्ट्रीजने आयात करण्यास नकार दिला. आता आयात शुल्क शून्य झाले.

- विजय जावंधिया, शेतकरी अभ्यासक

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीVidarbhaविदर्भ