शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आंदोलन, परतीचा पाऊस अन् घसरलेले दर..; यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

By रूपेश उत्तरवार | Updated: October 13, 2022 18:18 IST

संकटांची मालिका संपणार कधी?

यवतमाळ :शेतकरी आणि संकटांची मालिका एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,असे म्हणण्याची वेळ यावर्षी शेतकऱ्यांवर आली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेली संकटांची मालिका ऑक्टोबर महिना आला तरी पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन आणि शेतमालाच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांपुढील संकटांच्या मालिकांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.

दिवसेंदिवस शेतीचे गणित बिकट होत आहे. निसर्ग प्रकोप आणि वाढत्या महागाईने शेतकरी बेजार झाले आहेत. त्यातच शेतमालाचे दर घसरल्याने हवालदिल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी सात हजार रुपयेे क्विंटल असलेले सोयाबीनचे दर आता ४४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कापसाचे दरही असेच गडगडले आहेत.

यावर्षी १४ हजार रुपये क्विंटल दर कापसाला मिळेल,अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात कापसाचे दर आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहे. कळंबमध्ये कापसाच्या शुभारंभाला हे दर मिळाले आहेत. यामध्ये पूर्वीच्या दराच्या तुलनेत निम्मी घट नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे दिवाळे

शेतमालाचे दर पाहून शेतकऱ्यांची हिम्मत वाढली होती. त्यामुळे त्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. खते,बियाणे, कीटकनाशकांच्या किमती वधारल्या असतानाही शेतकऱ्यांनी चालढकल केली नाही. सोयाबीनला मिळालेल्या दराने बियाणे कंपन्यांनी बॅगचे दर वाढविले. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मजुरी दरावर ही झाला. सोयाबीनची बॅग काढण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपयांचा दर आहे. त्यात सोयाबीन किती निघेल याचा अंदाज नाही.

बोनस दिला तरच शेतकरी तरतील

खर्च आणि नैसर्गिक आपत्ती पाहता कापूस दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस हवा आहे. साखर निर्यातीला सबसिडी मिळते. मात्र,सोयाबीन निर्यातीला सरकार सबसिडी देत नाही. कापसाच्या निर्यातीला सबसिडी हवी,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

विनामूल्य आयात धोरणाचा फटका

सोयाबीन आणि सोयापेंडचे विनामूल्य आयात धोरण शेतकऱ्यांना महागात पडले आहे. महागाई कमी करण्याच्या नावाखाली आयात होत आहे. त्याचा फटका थेट शेतमालावर पडत आहे. दरात घसरण झाली आहे. राज्यात सोयाबीनचे उत्पन्न घटणार असले तरी इतर ठिकाणी उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रारंभी सोयाबीनचा दर दबावात राहणार आहे. मात्र,नंतरच्या काळात दर वाढण्याचा अंदाज आहे.

जागतिक बाजारात कापसाचे दर उतरले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६० ते ६५ हजार रुपये खंडीचे दर आहेत. गतवर्षी एक लाख रुपये खंडीपर्यंत रुईचे दर होते. गतवर्षी एक्सपोर्ट झाले. सोयाबीनची ढेप आयात झाली नाही. सोयाबीन इंडस्ट्रीजने आयात करण्यास नकार दिला. आता आयात शुल्क शून्य झाले.

- विजय जावंधिया, शेतकरी अभ्यासक

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीVidarbhaविदर्भ