शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

आंदोलन, परतीचा पाऊस अन् घसरलेले दर..; यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

By रूपेश उत्तरवार | Updated: October 13, 2022 18:18 IST

संकटांची मालिका संपणार कधी?

यवतमाळ :शेतकरी आणि संकटांची मालिका एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत,असे म्हणण्याची वेळ यावर्षी शेतकऱ्यांवर आली आहे. जुलै महिन्यापासून सुरू झालेली संकटांची मालिका ऑक्टोबर महिना आला तरी पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन आणि शेतमालाच्या घसरलेल्या दराने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांपुढील संकटांच्या मालिकांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.

दिवसेंदिवस शेतीचे गणित बिकट होत आहे. निसर्ग प्रकोप आणि वाढत्या महागाईने शेतकरी बेजार झाले आहेत. त्यातच शेतमालाचे दर घसरल्याने हवालदिल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी सात हजार रुपयेे क्विंटल असलेले सोयाबीनचे दर आता ४४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कापसाचे दरही असेच गडगडले आहेत.

यावर्षी १४ हजार रुपये क्विंटल दर कापसाला मिळेल,अशी शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात कापसाचे दर आठ हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहे. कळंबमध्ये कापसाच्या शुभारंभाला हे दर मिळाले आहेत. यामध्ये पूर्वीच्या दराच्या तुलनेत निम्मी घट नोंदविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे दिवाळे

शेतमालाचे दर पाहून शेतकऱ्यांची हिम्मत वाढली होती. त्यामुळे त्यांनी शेतीवर मोठा खर्च केला. खते,बियाणे, कीटकनाशकांच्या किमती वधारल्या असतानाही शेतकऱ्यांनी चालढकल केली नाही. सोयाबीनला मिळालेल्या दराने बियाणे कंपन्यांनी बॅगचे दर वाढविले. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मजुरी दरावर ही झाला. सोयाबीनची बॅग काढण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपयांचा दर आहे. त्यात सोयाबीन किती निघेल याचा अंदाज नाही.

बोनस दिला तरच शेतकरी तरतील

खर्च आणि नैसर्गिक आपत्ती पाहता कापूस दर कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनस हवा आहे. साखर निर्यातीला सबसिडी मिळते. मात्र,सोयाबीन निर्यातीला सरकार सबसिडी देत नाही. कापसाच्या निर्यातीला सबसिडी हवी,अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

विनामूल्य आयात धोरणाचा फटका

सोयाबीन आणि सोयापेंडचे विनामूल्य आयात धोरण शेतकऱ्यांना महागात पडले आहे. महागाई कमी करण्याच्या नावाखाली आयात होत आहे. त्याचा फटका थेट शेतमालावर पडत आहे. दरात घसरण झाली आहे. राज्यात सोयाबीनचे उत्पन्न घटणार असले तरी इतर ठिकाणी उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. प्रारंभी सोयाबीनचा दर दबावात राहणार आहे. मात्र,नंतरच्या काळात दर वाढण्याचा अंदाज आहे.

जागतिक बाजारात कापसाचे दर उतरले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत ६० ते ६५ हजार रुपये खंडीचे दर आहेत. गतवर्षी एक लाख रुपये खंडीपर्यंत रुईचे दर होते. गतवर्षी एक्सपोर्ट झाले. सोयाबीनची ढेप आयात झाली नाही. सोयाबीन इंडस्ट्रीजने आयात करण्यास नकार दिला. आता आयात शुल्क शून्य झाले.

- विजय जावंधिया, शेतकरी अभ्यासक

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीVidarbhaविदर्भ