५२ ग्रामपंचायतीत ९७० उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: July 17, 2015 02:36 IST2015-07-17T02:36:11+5:302015-07-17T02:36:11+5:30

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यातील चार ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ...

In the 92 gram panchayat, 970 candidates are in the fray | ५२ ग्रामपंचायतीत ९७० उमेदवार रिंगणात

५२ ग्रामपंचायतीत ९७० उमेदवार रिंगणात

उमरखेड तालुका : चार ग्रामपंचायती अविरोध, अनेक गावात रंगतदार लढती
अविनाश खंदारे उमरखेड
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यातील चार ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ५२ ग्रामपंचायतींसाठी ९७० उमेदवार रिंगणात आहे. अनेक ग्रामपंचायतीत कडवा संघर्ष होण्याची चिन्हे आहे.
उमरखेड तालुक्यातील ५६ गावात निवडणुका घोषित झाल्या होत्या. ५६ ग्रामपंचायतींसाठी १२२१ उमेदवारांनी नामांकन भरले होते. त्यातील २५१ जणांनी माघार घेतली. तर नागापूर, चिंचोली, आमडापूर, परजना ही चार गावे अविरोध झाली आहे. आता ५२ ग्रामपंचायतींत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यात सुकळी न., कुपटी, बोथा वन, धनज, कळमुला, तिवरंग, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस बु., उंचवडद, डोंगरगाव, सोईट घ., सोनदाबी, खरूस खु., टेंभुरदरा, हातला, दिवट पिंपरी, पोफाळी, पार्डी बंगला, चिंचोली संगम, तिवडी, बिटरगाव खु., लिंबगव्हाण, वरुड बिबी, चुरमुरा, वाणेगाव, दहागाव, मन्याळी, बाळदी, कृष्णापूर, कारखेड, लोहरा खु., देवसरी, दिंडाळा, ढाणकी, मेट, गाजेगाव, निगनूर, टाकळी इजारा, कोपरा बु., पिंपळगाव, चिखली, अकोली, भवानी, सावळेश्वर, करंजी, बोरगाव, दराटी आदी गावांचा समावेश आहे.
अनेक गावातील उमेदवार हे गावातील समस्या घेऊन रिंगणात उभे ठाकले आहे. निवडणुकीत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पोफाळी येथे अतिशय चुरशीची निवडणूक होत असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण व विद्यमान महिला व बालकल्याण सभापती विमल चव्हाण यांच्या नेतृत्वात सर्वच पक्षाचे लोक एकत्र येवून पॅनल तयार केले आहे. तर त्यांच्याविरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव तालनकर यांच्या नेतृत्वात पॅनल उभे केले आहे. विडूळ गावात उमरखेड पंचायत समितीच्या सभापती प्रयागबाई कोत्तेवार, जिल्हा परिषद सदस्य संदीप हिंगमिरे यांच्या नेतृत्वातील पॅनल उभे आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा यांनी मिळून भगवान धोपटे, अनिल देशमुख, मिलिंद धुळे, बापुराव धुळे यांनी लढत देण्याची तयारी चालविली आहे.
पाणीटंचाईच्या गावात निवडणूक जोमात
पोफाळी : दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने उमरखेड तालुक्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येकजण निवडणुकीसाठी सज्ज आहे. अशा स्थितीत पावसाची दडी आणि पाणीटंचाईचे सावट आहे. मात्र गावकऱ्यांना त्याचे काही देणे-घेणे दिसत नाही. पाणीटंचाई असलेल्या गावात निवडणुकीने जोर मात्र चांगलाच धरला आहे. उमरखेड तालुक्यातील कळमुला गावातील नळयोजना कित्येक दिवसांपासून बंद आहे. नागरिक आपली तहान कशीबशी भागवत आहे. पोफाळीजवळच्या वसंतनगर येथेही अशीच अवस्था आहे. बाराही महिने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परंतु निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पाणीटंचाईचा प्रश्न मात्र दुर्लक्षिला जात आहे.

Web Title: In the 92 gram panchayat, 970 candidates are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.