शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता अपघातात ५९ दिवसांत ८३ जणांचा गेला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:46 IST

Yavatmal : ३७ अपघात पांढरकवडा उपविभागात झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. येथे सातत्याने अपघात होत असून, जीवितहानी होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५६ अपघात घडले असून, यात ५९ दिवसांत ८३ जणांचा बळी गेला आहे. तर ९५ जण गंभीर जखमी आहेत. अपघातामध्ये घरातील कर्ती व्यक्तीच निघून जाते. त्यामुळे याचा मोठा परिणाम त्या कुटुंबाच्या भविष्यावर होतो. पर्यायाने सामाजिक नुकसानही होत आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे. 

रस्त्यांचा आकार वाढत असतानाच वाहन संख्याही त्याच पटीने वाढली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची वाढ होऊ लगाली आहे. स्वतःची दुचाकी, चारचाकी आता प्रत्येकाची गरज बनली आहे. अशा स्थितीत वाहतूक नियमांचे पालन होत नाही. यातून भीषण अपघात घडत आहेत. रस्ता सुरक्षा व वाहतूक नियम यांचा केवळ गाजावाजा केला जातो. परिवहन विभाग, वाहतूक पोलिस केवळ दंडात्मक कारवाईतून शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतरही याचा परिणाम दिसत नाही. अपघातातून ओढावलेला मृत्यू टाळता येणे शक्य आहे. यासाठी अजूनही मोठे काम होण्याची गरज आहे. 

जिल्ह्यातील पोलिस उपविभागनिहाय आकडेवारी पाहता पांढरकवडा येथे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. येथे दोन महिन्यांत ३७ अपघातांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. २० जण जखमी झाले आहेत.

अतिवेगाने अपघातराष्ट्रीय महामार्गावर प्रमाण अधिक चौपदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वेगमर्यादा पाळली जात नाही. अनेक गावाजवळ विरुध्द दिशेने प्रवास केला जातो. येथेच अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यातील मृत्यूदरही जास्त आहे. जिल्ह्यातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्गावर हे प्रमाण जास्त दिसते.

उपविभागनिहाय अपघातउपविभाग          अपघात         मृत्यू         जखमीयवतमाळ               ३६                 १५               ३४पांढरकवडा            ३७                 २२               २०वणी                       १७                  १३               १२पुसद                      २४                  १२              ०८उमरखेड                ११                   ०५             ०६दारव्हा                   ३१                   १६              १५एकूण                   १५६                  ८३              ९५

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाYavatmalयवतमाळ