शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

पश्चिम विदर्भात ७८ ब्रिटिशकालीन पूल; आजही भक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 23:55 IST

ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे४८ पुलांचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरण

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्रिटिशांच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या वास्तू या दर्जा, गुणवत्ता व वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना ठरल्या आहेत. एकट्या पश्चिम विदर्भात ब्रिटिशकालीन ७८ पुलांची नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.ब्रिटिशांनी देश सोडून ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी निर्माण केलेल्या वास्तूंची सद्यस्थिती काय यावर प्रकाशझोत टाकला असता शंभर वर्षानंतरही ब्रिटिशांनी बांधलेल्या वास्तू शाबूत असल्याचे आढळून आले आहे.

ब्रिटिशकाळात पूल, इमारती, कारागृह, शासकीय कार्यालये, विश्रामगृह, रेल्वे स्टेशन, रेल्वे पूल, नगरभवन आदींची उभारणी केली गेली होती. यातील बहुतांश वास्तू कार्यान्वित आहेत. कुठे शासकीय कार्यालये सुरू आहेत तर कुठे कारागृहांच्या उत्तुंग इमारतीआत सुरक्षा व्यवस्था अबाधित आहे. ब्रिटिशकाळात बांधलेले चिखलदरा-धारणी (मेळघाट) या थंड हवेच्या ठिकाणाला जोडणारे पूल आजही भक्कम आहेत.

तेथील कायम थंडावा देणारे विशिष्ट पद्धतीच्या बांधणीचे विश्रामगृह वापरात आहेत. ब्रिटिशांनी उभारलेल्या या वास्तू गुणवत्तेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत. आता पूल अथवा इमारती निर्माण झाल्यानंतर लगेच किंवा निर्माणाधीन असतानाच कोसळण्याच्या घटना घडतात. परंतु ब्रिटिशकालीन बांधकामे शंभर-दिडशे वर्षानंतरही उत्तम स्थितीत व वापरात आहेत यातच त्यांच्या बांधकामांची गुणवत्ता दडलेली आहे.

चौपदरीकरणातही ब्रिटिश पूल कायमब्रिटिशकालीन इमारतींची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे. बहुतांश रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण केले जात आहे. मात्र या सपाट्यातही ब्रिटिशकालीन पूल अनेक ठिकाणी कायम ठेवले गेले आहे.

सर्वाधिक ६३ पूल अमरावती जिल्ह्यातएकट्या अमरावती विभागात ७८ पूल आहेत. त्यापैकी सर्वाधिक ६३ अमरावती जिल्ह्यात आहेत. बुलडाणा १०, अकोला चार तर यवतमाळ येथे एकमेव पूल आहे. वाशिम जिल्ह्यात ब्रिटिशकालीन एकाही पुलाची नोंद नाही. ७८ पैकी ४८ पूल राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित केले गेले आहे. त्यामधील सर्वाधिक ४० पूल अमरावतीचे तर अकोला, बुलडाणाचे प्रत्येकी एक पूल आहे.

३० पुलांची दुरुस्ती बांधकाम खात्याकडेच३० पुलांची देखभाल-दुरुस्ती आजही सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यांतर्गत राहेरी येथील ब्रिटिशकालीन पूल वापरास मनाई करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही केवळ अंतर वाचविण्यासाठी वाहनधारक जीव धोक्यात घालून नियमबाह्यरीत्या या पुलाचा वापर करतात.यवतमाळच्या पुलाचे आयुष्य १३५ वर्षांचेयवतमाळहून धामणगाव रेल्वेकडे जाणाऱ्या मार्गावर नांदुरा येथे १८८५ मध्ये ब्रिटिशांनी पुलाचे निर्माण केले होते. १३५ वर्षांपूर्वीचा हा पूल आजही शाबूत आहे. मात्र तो अरुंद असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने बाजूला दहा वर्षांपूर्वी दुसरा नवा पूल तयार करण्यात आला आहे. पांढरकवडा रोडवरील मोहदा-करंजी मार्गावर रुंझा येथे ब्रिटिशकालीन अरुंद पूल आहे. त्याच्या नवनिर्माण तथा दुरुस्तीसाठी बांधकाम खात्याने प्रस्ताव सादर केला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ३० पुलांची देखरेख आहे. या पुलांची सातत्याने आवश्यक तेथे डागडुजी केली जाते. ४८ पूल महामार्ग विभागाला हस्तांतरित केले गेले.- प्रशांत नवघरेमुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम यवतमाळ.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग