शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यातील पिकांची नजर पैसेवारी ६५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 21:57 IST

निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकºयांना झटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना झटका : अंतिम पैसेवारीवर ठरणार दुष्काळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना झटका बसला आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले. नंतर विविध किडींच्या आक्रमणाने बेजार झाले. कापसाला पर्यायी पीक म्हणून पसंती मिळालेले सोयाबीन अपुºया पावसाने पूर्णत: करपले. अनेक शेतकऱ्यांनी तर सोयाबीन सवंगलेसुद्धा नाही. त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. या दुष्टचक्रात शेतकरी भरडले जात असताना महसूल विभागाने जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र ६५ पैसे असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी चक्रावून गेले आहे. कपाशी, सोयाबीनवर विविध कीड, अळींनी हल्ला केल्यानंतरही पैसेवारी जादा निघत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. जादा पैसेवारीमुळे दुष्काळ घोषित होण्याचा मार्ग बंद होणार आहे.विशेष म्हणजे नजर पैसेवारीसाठी पीक कापणी प्रयोग सुरू असताना जिल्हाधिकाºयांनी स्वत: शेतात जाऊन शेतमालाची पाहणी केली. शेतातील उभी पिके त्यांच्या नजरेखालून गेली. पिकांची अवस्था बघून ते व्यथीतही झाले होते. त्यामुळे महसूलच्या अहवालातून वास्तव पुढे येईल, असा विश्वास शेतकºयांना होता. प्रत्यक्षात नजर पैसेवारी ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. यावर्षी ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यात शेतकºयांना मात्र मोठा फटका बसला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मदतीची मागणी करीत आहे. पिकांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. तरीही उत्तम पैसेवारी निघत असल्याने शेतकºयांच्या मदतीच्या आशा मावळल्या आहे. आता सुधारित आणि अंतिम पैसेवारीवरच सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. सुधारित आणि अंतिम पैसेवारी ५0 टक्केच्या आत आल्यासच शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळू शकणार आहे. यामुळे सुधारित आणि अंतिम पैसेवारीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे.असा ठरविला जातो दुष्काळदुष्काळ ठरविण्यासाठी केंद्र सरकाने काही निकष निश्चित केले आहे. या निकषात बसल्यासच दुष्काळ जाहीर केला जातो. पाऊस, पीक, आर्द्रता आणि पावसामधील खंड, यावरून दुष्काळ जाहीर केला जातो. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण उत्तम आहे. मात्र मध्यंतरीच्या खंडाने सोयाबीनचे उत्पादन घटले. तथापि हा खंड २२ दिवसांपेक्षा जादा असावा लागतो.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती