शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पिकांची नजर पैसेवारी ६५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 21:57 IST

निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकºयांना झटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना झटका : अंतिम पैसेवारीवर ठरणार दुष्काळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना झटका बसला आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले. नंतर विविध किडींच्या आक्रमणाने बेजार झाले. कापसाला पर्यायी पीक म्हणून पसंती मिळालेले सोयाबीन अपुºया पावसाने पूर्णत: करपले. अनेक शेतकऱ्यांनी तर सोयाबीन सवंगलेसुद्धा नाही. त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. या दुष्टचक्रात शेतकरी भरडले जात असताना महसूल विभागाने जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र ६५ पैसे असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी चक्रावून गेले आहे. कपाशी, सोयाबीनवर विविध कीड, अळींनी हल्ला केल्यानंतरही पैसेवारी जादा निघत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. जादा पैसेवारीमुळे दुष्काळ घोषित होण्याचा मार्ग बंद होणार आहे.विशेष म्हणजे नजर पैसेवारीसाठी पीक कापणी प्रयोग सुरू असताना जिल्हाधिकाºयांनी स्वत: शेतात जाऊन शेतमालाची पाहणी केली. शेतातील उभी पिके त्यांच्या नजरेखालून गेली. पिकांची अवस्था बघून ते व्यथीतही झाले होते. त्यामुळे महसूलच्या अहवालातून वास्तव पुढे येईल, असा विश्वास शेतकºयांना होता. प्रत्यक्षात नजर पैसेवारी ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. यावर्षी ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यात शेतकºयांना मात्र मोठा फटका बसला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मदतीची मागणी करीत आहे. पिकांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. तरीही उत्तम पैसेवारी निघत असल्याने शेतकºयांच्या मदतीच्या आशा मावळल्या आहे. आता सुधारित आणि अंतिम पैसेवारीवरच सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. सुधारित आणि अंतिम पैसेवारी ५0 टक्केच्या आत आल्यासच शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळू शकणार आहे. यामुळे सुधारित आणि अंतिम पैसेवारीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे.असा ठरविला जातो दुष्काळदुष्काळ ठरविण्यासाठी केंद्र सरकाने काही निकष निश्चित केले आहे. या निकषात बसल्यासच दुष्काळ जाहीर केला जातो. पाऊस, पीक, आर्द्रता आणि पावसामधील खंड, यावरून दुष्काळ जाहीर केला जातो. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण उत्तम आहे. मात्र मध्यंतरीच्या खंडाने सोयाबीनचे उत्पादन घटले. तथापि हा खंड २२ दिवसांपेक्षा जादा असावा लागतो.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती