शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

जिल्ह्यातील पिकांची नजर पैसेवारी ६५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 21:57 IST

निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकºयांना झटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना झटका : अंतिम पैसेवारीवर ठरणार दुष्काळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना झटका बसला आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले. नंतर विविध किडींच्या आक्रमणाने बेजार झाले. कापसाला पर्यायी पीक म्हणून पसंती मिळालेले सोयाबीन अपुºया पावसाने पूर्णत: करपले. अनेक शेतकऱ्यांनी तर सोयाबीन सवंगलेसुद्धा नाही. त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. या दुष्टचक्रात शेतकरी भरडले जात असताना महसूल विभागाने जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र ६५ पैसे असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी चक्रावून गेले आहे. कपाशी, सोयाबीनवर विविध कीड, अळींनी हल्ला केल्यानंतरही पैसेवारी जादा निघत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. जादा पैसेवारीमुळे दुष्काळ घोषित होण्याचा मार्ग बंद होणार आहे.विशेष म्हणजे नजर पैसेवारीसाठी पीक कापणी प्रयोग सुरू असताना जिल्हाधिकाºयांनी स्वत: शेतात जाऊन शेतमालाची पाहणी केली. शेतातील उभी पिके त्यांच्या नजरेखालून गेली. पिकांची अवस्था बघून ते व्यथीतही झाले होते. त्यामुळे महसूलच्या अहवालातून वास्तव पुढे येईल, असा विश्वास शेतकºयांना होता. प्रत्यक्षात नजर पैसेवारी ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. यावर्षी ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यात शेतकºयांना मात्र मोठा फटका बसला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मदतीची मागणी करीत आहे. पिकांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. तरीही उत्तम पैसेवारी निघत असल्याने शेतकºयांच्या मदतीच्या आशा मावळल्या आहे. आता सुधारित आणि अंतिम पैसेवारीवरच सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. सुधारित आणि अंतिम पैसेवारी ५0 टक्केच्या आत आल्यासच शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळू शकणार आहे. यामुळे सुधारित आणि अंतिम पैसेवारीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे.असा ठरविला जातो दुष्काळदुष्काळ ठरविण्यासाठी केंद्र सरकाने काही निकष निश्चित केले आहे. या निकषात बसल्यासच दुष्काळ जाहीर केला जातो. पाऊस, पीक, आर्द्रता आणि पावसामधील खंड, यावरून दुष्काळ जाहीर केला जातो. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण उत्तम आहे. मात्र मध्यंतरीच्या खंडाने सोयाबीनचे उत्पादन घटले. तथापि हा खंड २२ दिवसांपेक्षा जादा असावा लागतो.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती