शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटींचा पीक विमा मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले.

ठळक मुद्देसर्वाधिक मदत सोयाबीन उत्पादकांना : कापूस, ज्वारी, उडीद, मूग आणि तुरीलाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी खरीप हंगामामध्ये पिकाचा विमा उतरविणाऱ्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक मदतीस पात्र शेतकरी सोयाबीन उत्पादक असून कापूस, ज्वारी, उडीद, मूग आणि तूर उत्पादकांनाही पीक विम्याची मदत मिळणार आहे. विमा कंपनीने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वळती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विमा उतरविणारे चार लाख शेतकरी या पीक विम्याला मुकले आहे. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी तीन लाख ३६ हजार ५४९ हेक्टरसाठी विमा सुरक्षाकवच उभारले होते. त्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३५ कोटी रुपये विमा कंपनीकडे वळते केले होते. गतवर्षीचा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. यामुळे विमा उतरविणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला मदतीची अपेक्षा होती. जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाने दुष्काळी स्थिती जाहीर झाली होती. यामुळे हमखास विमा मिळेल, अशी आशा सर्वच शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ६१ हजार शेतकरी मदतीला पात्र ठरविले आहे. उर्वरित चार लाख सहा हजार शेतकरी या मदतीस अपात्र ठरविण्यात आले. पात्र असलेल्या ६१ हजार शेतकऱ्यांना ४७ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक मंडळामध्ये विम्याची ही रक्कम भिन्न आहे. याशिवाय, पात्र शेतकऱ्यांची संख्याही विभागण्यात आली आहे. कुठल्या शेतकऱ्यांना किती रुपयांची मदत मिळाली, याची माहिती कृषी विभागालाही सध्या उपलब्ध नाही. मिळालेली संपूर्ण रक्कम विमा कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली आहे. काही बँकांनी मदतवाटपाला सुरुवातही केली आहे. जिल्ह्यातील सर्वच पिके मदतीला पात्र ठरली आहे. जिल्ह्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक संख्या मदतीला पात्र ठरली आहे. एक लाख ९७ हजार ५१० शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यातील २५ हजार ४०४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना २४ कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला आहे.  तर, एक लाख सात हजार ६६ शेतकऱ्यांनी कापसाचा विमा उतरविला होता. यातील दहा हजार ६८४ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना १२ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या ४३ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला. यातील दहा हजार ५९ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना तीन कोटी ९२ लाख रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. उडिदाचे उत्पादन घेणाऱ्या २६ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यातील ३२२ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांना सहा लाख ७९ हजार रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. मुगाची लागवड करणाऱ्या २६ हजार ९१७ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यामधील १४५३ शेतकरी मदतीला पात्र ठरले आहे. त्यांना २८ लाख ४४ हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. तुरीची लागवड करणाऱ्या ६७ हजार शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला होता. यामध्ये १३ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या शेतकऱ्यांना सहा कोटी ६३ लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. इतर शेतकऱ्यांना मदतीला मुकावे लागले आहे.  

असे आहेत मदतीला पात्र ठरलेले तालुक्यातील शेतकरी 

 आर्णी तालुक्यात ९२५ शेतकऱ्यांना ५१ लाख १५ हजार ९१५ रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. बाभूळगाव चार हजार १२५ शेतकरी, चार कोटी ५९ लाख. दारव्हा एक हजार ९० शेतकरी ८६ लाख २३ हजार. दिग्रस १६९३ शेतकरी, १ कोटी २३ लाख. घाटंजी १६ हजार २१५ शेतकरी, १६ कोटी ६८ लाख. कळंब तीन हजार ९३ शेतकरी, एक कोटी २८ लाख. केळापूर सात हजार ४३२ शेतकरी, सात कोटी ४६ लाख. महागाव चार हजार ६९० शेतकरी, एक कोटी ५६ लाख. मारेगाव दोन हजार ४५४ शेतकरी, ८३ लाख. नेर ५०३ शेतकरी, ४६ लाख ९२ हजार. पुसद दोन हजार ९३ शेतकरी, एक कोटी ८७ लाख. राळेगाव दोन हजार २८१ शेतकरी, एक कोटी ४७ लाख. उमरखेड सात हजार ६६३ शेतकरी, चार कोटी आठ लाख. वणी १५६८ शेतकरी, ६७ लाख. यवतमाळ चार हजार १०० शेतकरी, दोन कोटी ८७ लाख. झरी जामणी १३६४ शेतकरी, ६९ लाख.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी