शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शिळे अन्न खाऊ घातले, आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:05 IST

१२ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू

पुसद (यवतमाळ) : रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून खाऊ घातल्यामुळे तब्बल ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. हा प्रकार तालुक्यातील हुडी येथील गिरधारी महाराज व्हीजेएनटी आश्रमशाळेत शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. सायंकाळी १२ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या आश्रमशाळेत एकंदर २७५ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यातील १५० मुले आणि १०० मुली असे २५० विद्यार्थी वसतिगृहात निवासी आहेत. विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास जेवण देण्यात आले. त्यानंतर अचानक मळमळ, उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ५४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. यात सात मुलींचा समावेश आहे.

बाधित सर्वांनी पुसद येथील दोन ते तीन खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली. अत्यवस्थ मुलांना आवश्यक उपचार देऊन दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनीसुद्धा या बाबीची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांची विचारपूस सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनीसुद्धा रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून दिल्याने अचानक तब्येत खराब झाल्याचे सांगितले. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली. अन्नातून विषबाधेचा प्रकार लक्षात येताच प्रशासनाचीही तारांबळ उडाली.

विषबाधेचा प्रकार लक्षात येताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसील प्रशासनाने हुडी येथील आश्रमशाळा गाठली. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही आश्रमशाळेत भेट दिली. तसेच रुग्णालयात पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना दिवसभर डाॅक्टरांच्या देखरेखीत ठेवल्यानंतर यातील बहुतांश विद्यार्थ्यांना सायंकाळी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, १२ विद्यार्थ्यांना अद्यापही सलाईन लावून रुग्णालयातच ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, आश्रमशाळेत घडलेल्या प्रकाराने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

 बिरसा ब्रिगेड आंदोलनाच्या पवित्र्यात

पुसद तालुक्यातील हुडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधेच्या गंभीर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आश्रमशाळा प्रशासनावर व हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

उपचारासाठी भरती केलेल्या मुला-मुलींची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. घटनेची माहिती यवतमाळ येथील समाजकल्याण सहायक आयुक्तांना दिली असून, लवकरच ते चौकशी करतील.

- महादेव जोरवार, तहसीलदार, पुसद

आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा हा प्रकार निदर्शनास आला. वसतिगृहात २५० विद्यार्थी आहेत. सकाळचे जेवण वसतिगृहात केल्यानंतर विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी त्यांना त्रास सुरू झाला. आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

- के.आर. डोरले, मुख्याध्यापक, हुडी

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थीYavatmalयवतमाळ