शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिळे अन्न खाऊ घातले, आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:05 IST

१२ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू

पुसद (यवतमाळ) : रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून खाऊ घातल्यामुळे तब्बल ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. हा प्रकार तालुक्यातील हुडी येथील गिरधारी महाराज व्हीजेएनटी आश्रमशाळेत शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. सायंकाळी १२ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उर्वरित विद्यार्थ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या आश्रमशाळेत एकंदर २७५ विद्यार्थी प्रवेशित आहेत. त्यातील १५० मुले आणि १०० मुली असे २५० विद्यार्थी वसतिगृहात निवासी आहेत. विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास जेवण देण्यात आले. त्यानंतर अचानक मळमळ, उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे ५४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले. यात सात मुलींचा समावेश आहे.

बाधित सर्वांनी पुसद येथील दोन ते तीन खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली. अत्यवस्थ मुलांना आवश्यक उपचार देऊन दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनीसुद्धा या बाबीची गंभीर दखल घेत विद्यार्थ्यांची विचारपूस सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनीसुद्धा रात्रीचे शिळे अन्न सकाळी गरम करून दिल्याने अचानक तब्येत खराब झाल्याचे सांगितले. या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली. अन्नातून विषबाधेचा प्रकार लक्षात येताच प्रशासनाचीही तारांबळ उडाली.

विषबाधेचा प्रकार लक्षात येताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसील प्रशासनाने हुडी येथील आश्रमशाळा गाठली. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनीही आश्रमशाळेत भेट दिली. तसेच रुग्णालयात पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना दिवसभर डाॅक्टरांच्या देखरेखीत ठेवल्यानंतर यातील बहुतांश विद्यार्थ्यांना सायंकाळी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर, १२ विद्यार्थ्यांना अद्यापही सलाईन लावून रुग्णालयातच ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, आश्रमशाळेत घडलेल्या प्रकाराने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

 बिरसा ब्रिगेड आंदोलनाच्या पवित्र्यात

पुसद तालुक्यातील हुडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधेच्या गंभीर घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आश्रमशाळा प्रशासनावर व हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

उपचारासाठी भरती केलेल्या मुला-मुलींची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. घटनेची माहिती यवतमाळ येथील समाजकल्याण सहायक आयुक्तांना दिली असून, लवकरच ते चौकशी करतील.

- महादेव जोरवार, तहसीलदार, पुसद

आम्ही शाळेत पोहोचलो तेव्हा हा प्रकार निदर्शनास आला. वसतिगृहात २५० विद्यार्थी आहेत. सकाळचे जेवण वसतिगृहात केल्यानंतर विद्यार्थी शाळेत येण्यापूर्वी त्यांना त्रास सुरू झाला. आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

- के.आर. डोरले, मुख्याध्यापक, हुडी

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थीYavatmalयवतमाळ