५२ कृषी सहायकांचा सव्वा कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:47 IST2017-09-21T00:46:48+5:302017-09-21T00:47:21+5:30
कृषी खात्यामार्फत शेतकºयांसाठी राबविल्या जाणाºया कृषी साहित्याच्या योजनांमध्ये शेतकºयांकडून दहा टक्के वाटा म्हणून (शेतकरी हिस्सा) रक्कम गोळा करण्यात आली.

५२ कृषी सहायकांचा सव्वा कोटींचा अपहार
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कृषी खात्यामार्फत शेतकºयांसाठी राबविल्या जाणाºया कृषी साहित्याच्या योजनांमध्ये शेतकºयांकडून दहा टक्के वाटा म्हणून (शेतकरी हिस्सा) रक्कम गोळा करण्यात आली. परंतु ती पुरवठादार महामंडळाकडे न भरता परस्पर हडप केली गेली. ही रक्कम एक कोटी २९ लाख रुपये एवढी प्रचंड असून यातील ५२ कृषी सहायक आता फौजदारीच्या रडारवर आहेत.
कृषी विभागामार्फत शेतकºयांसाठी अनुदानावर योजना राबविल्या जातात. डिझेल इंजीन, इलेक्ट्रीक मोटार, स्प्रेअर, पाईप अशा प्रकारचे साहित्य शेतकºयांना दिले जाते. त्यासाठी शेतकºयांना दहा टक्के रक्कम स्वत: आधी भरावी लागते. त्यानंतर त्यांना ९० टक्के अनुदानावर साहित्य दिले जाते. या साहित्याचा पुरवठा महाराष्टÑ कृषी उद्योग विकास महामंडळासह (एमएआयडीसी) अन्य संस्थांमार्फत केला जातो. कृषी सहायक शेतकºयांकडील या दहा टक्के हिश्याची रक्कम गोळा करतात. ती त्यांनी ‘एमएआयडीसी’कडे तातडीने भरणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात कृषी सहायक ही रक्कम लगेच भरत नाही. शिवाय वस्तूंचे परस्पर वितरण केले जाते. गेल्या काही वर्षात शेतकरी हिश्याच्या रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ५२ कृषी सहायकांकडे एक कोटी २९ लाखांची रक्कम थकीत आहे. त्यातील सर्वाधिक २३ लाखांची रक्कम ही एकट्या दिग्रस तालुक्यातील केवळ तीन कृषी सहायकांकडे आहे. तर बाभूळगाव तालुक्यातील २४ कृषी सहायकांकडे १३ लाख रुपये थकीत आहे. नेर तालुक्यातील पाच सहायकांकडे १९ लाख थकीत आहेत.
‘एमएआयडीसी’कडून या रकमेच्या वसुलीसाठी कृषी अधिकारी व जिल्हा प्रशासनामार्फत वारंवार प्रयत्न झाले. परंतु परिणाम झाला नाही. उलट शासकीय रकमेचा अपहार करुनही कृषी सहायक मंडळी मुजोर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या सर्व ५२ कृषी सहायकांवर एक कोटी २९ लाखांच्या रकमेसाठी थेट संबंधित पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याची तयारी ‘एमएआयडीसी’ने चालविली आहे. त्यासाठी मंजुरी मिळाल्याचेही सांगितले जाते. अनेक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सन २००९-१० पासून कृषी साहित्याचे वाटपही झाले नसल्याची माहिती आहे. भांडारगृहात अनेक साहित्य जैसे थे पडून आहे.