शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्हाभरात 4 हजार 287 मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 5:00 AM

१ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे ४ हजार २८७ व्यवहार झाले आहेत. या व्यवहाराकरिता कोट्यवधी रुपयांचा शुल्क ग्राहकांना लागणार होता. मात्र राज्य शासनाने ३ टक्के सूट दिल्यामुळे खरेदी देणारा आणि घेणारा दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. ही उलाढाल करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला हजार ते लाख रुपयाचा भुर्दंड पडणार होता. हा भुर्दंड शासनाच्या नियमामुळे वाचला. त्याकरिता ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती.

ठळक मुद्देपुढील चार महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ३ टक्के सवलत मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. यामुळे राज्य शासनाने खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क ३ टक्क्याने कमी केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत त्याकरिता सूट देण्यात आली होती. यामुळे मोठ्या उद्योजकांसह ठेकेदार, घर व्यावसायिक यांनी खरेदी-विक्री कार्यालयात मोठी गर्दी केली होती. १ जानेवारी ते ३० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात खरेदी-विक्रीचे ४ हजार २८७ व्यवहार झाले आहेत. या व्यवहाराकरिता कोट्यवधी रुपयांचा शुल्क ग्राहकांना लागणार होता. मात्र राज्य शासनाने ३ टक्के सूट दिल्यामुळे खरेदी देणारा आणि घेणारा दोघांनाही मोठा दिलासा मिळाला. ही उलाढाल करण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला हजार ते लाख रुपयाचा भुर्दंड पडणार होता. हा भुर्दंड शासनाच्या नियमामुळे वाचला. त्याकरिता ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती. आता ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना पुढील चार महिने खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सूट मिळणार आहे. शासनाच्या या नियमामुळे घर, स्थावर मालमत्ता, शेती यासह विविध विषयाच्या खरेदी-विक्री व्यवहाराकरिता लाभार्थ्यांना लाभ मिळाला. यातून कोट्यवधी रुपयाचे मुद्रांक शासनाच्या तिजोरीत जमा झाले. या व्यवहाराकरिता मोजकेच दिवस असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली.

जिल्ह्यात खरेदी-विक्रीचा व्यवहार वाढलाजिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत अधिक मुद्रांकाची विक्री झाली. राज्य शासनाने खरेदी-विक्री करावर ३ टक्क्यांची सूट दिली. यामुळे या व्यवहारात वाढ नोंदविण्यात आली. याशिवाय ग्रामपंचायत निवडणुका आणि इतर कारणांमुळे मुद्रांकाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडणार आहे.     - सीमा काळेजिल्हा कोषागार अधिकारी, यवतमाळ

दहा कोटी नऊ लाखांचा महसूल मिळाला जिल्ह्यात यावर्षी ४ हजार २८७ खरेदी-विक्रीची नोंद करण्यात आली. ३१ डिसेंबरला अंतिम तारीख असल्याने सर्वाधिक गर्दी खरेदी-विक्रीच्या कार्यालयात पाहायला मिळाली. गतवर्षी ९ कोटी ७६ लाख ७२ हजार रुपयांचे स्टॅम्प विक्री झाले होते. यावर्षी १० कोटी ९ लाख ९ हजार ३०० रुपयांचे स्टॅम्प विक्री झाले. गतवर्षीच्या तुलनेत स्टॅम्पची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. या स्टॅम्पवर खरेदी-विक्रीच्या व्यवहारासह ग्रामपंचायत निवडणुकीकरिताही शपथपत्र दाखल करण्यासाठी उपयोग करण्यात येतो. यामुळे यावर्षी राज्य शासनाला जादाचा महसूल मिळणार आहे.

कोरोनाच्या नियमांचा विसरखरेदी-विक्री कार्यालयात दस्तऐवज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अपुरी जागा आणि सर्वांनाच आपले दस्तऐवज लवकर दाखल व्हावेत, अशी इच्छा असल्याने प्रत्येक जण कार्यालयामध्ये दाटीवाटीने दिसत होते. काहींच्या तोंडाला मास्क होते, तर सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतरही नागरिक गर्दी करीत होते.

 

टॅग्स :saleविक्री