शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अक्षयतृतीयेसाठी ३० हजार क्विंटल आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:12 IST

अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.

ठळक मुद्देकार्बाईडमुळे विक्री अर्ध्यावर : आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून फळांचा राजा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.यावर्षी दक्षिणात्य आंब्याची सर्वाधिक चलती आहे. या स्पर्धेत गावरान आंबा मागे पडला आहे. सध्या बाजारात आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूतून येणारा अांबा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यामध्ये बैगनपल्ली, तोतापुरी, लालबाग, चरखुस आणि हापूस आंब्याचा समावेश आहे. एक हजार कॅरेट बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. एका कॅरेटमध्ये २७ ते ३० किलो आंबे असतात. यानुसार ३० हजार क्विंटल आंब्यांची आवक बाजारात झाली आहे. त्याची विक्री करण्यासाठी २५० हातगाड्या आहेत. तर या तुलनेत गावरान आंबा मोजकाच बाजारात आला आहे. ६० ते १०० रूपये किलोपर्यंत आंब्याचे दर आहे. दक्षिणात्य आंब्याच्या स्पर्धेत गावरात आंबा असला तरी गावरान आंब्याला सर्वाधिक मागणी असते. मात्र गावरान आंबा बाजारात उपलब्धच होत नाही.अन्न व औषधी प्रशासन विभाग आहे तरी कुठे ?यवतमाळात कार्बाईडने पिकविलेली फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. रात्री हिरव्या कंच दिसणाऱ्या कैºया सकाळी पिवळ्या धम्म दिसतात. अर्थात त्या पिकलेला आंबा म्हणून ग्राहकांना थोपविल्या जातात. अशीच अवस्था बहुतांश फळांची आहे. परंतु त्यानंतरही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रुट मार्केटमध्ये धाड घालणे तर दूर साधी भेट दिल्याचेही ऐकिवात नाही. या अधिकाऱ्यांनी जणू फळविक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याची खुली सूट दिल्याचे दिसते. नगरपरिषदेचा आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करतो आहे.कृत्रिम पिकविण्यावर बंदीआंब्याला कृत्रिमरीत्या पिकविण्यावर बंदी आहे. नैसर्गिकरित्या आंबा पिकविण्यासाठी चार ते पाच दिवसाचा अवधी लागतो. यामुळे आंबा तयार होऊन विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पूर्वी ५० ते ६० हजार क्विंटल आंब्याची विक्री होत होती.