शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

अक्षयतृतीयेसाठी ३० हजार क्विंटल आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:12 IST

अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.

ठळक मुद्देकार्बाईडमुळे विक्री अर्ध्यावर : आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून फळांचा राजा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.यावर्षी दक्षिणात्य आंब्याची सर्वाधिक चलती आहे. या स्पर्धेत गावरान आंबा मागे पडला आहे. सध्या बाजारात आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूतून येणारा अांबा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यामध्ये बैगनपल्ली, तोतापुरी, लालबाग, चरखुस आणि हापूस आंब्याचा समावेश आहे. एक हजार कॅरेट बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. एका कॅरेटमध्ये २७ ते ३० किलो आंबे असतात. यानुसार ३० हजार क्विंटल आंब्यांची आवक बाजारात झाली आहे. त्याची विक्री करण्यासाठी २५० हातगाड्या आहेत. तर या तुलनेत गावरान आंबा मोजकाच बाजारात आला आहे. ६० ते १०० रूपये किलोपर्यंत आंब्याचे दर आहे. दक्षिणात्य आंब्याच्या स्पर्धेत गावरात आंबा असला तरी गावरान आंब्याला सर्वाधिक मागणी असते. मात्र गावरान आंबा बाजारात उपलब्धच होत नाही.अन्न व औषधी प्रशासन विभाग आहे तरी कुठे ?यवतमाळात कार्बाईडने पिकविलेली फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. रात्री हिरव्या कंच दिसणाऱ्या कैºया सकाळी पिवळ्या धम्म दिसतात. अर्थात त्या पिकलेला आंबा म्हणून ग्राहकांना थोपविल्या जातात. अशीच अवस्था बहुतांश फळांची आहे. परंतु त्यानंतरही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रुट मार्केटमध्ये धाड घालणे तर दूर साधी भेट दिल्याचेही ऐकिवात नाही. या अधिकाऱ्यांनी जणू फळविक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याची खुली सूट दिल्याचे दिसते. नगरपरिषदेचा आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करतो आहे.कृत्रिम पिकविण्यावर बंदीआंब्याला कृत्रिमरीत्या पिकविण्यावर बंदी आहे. नैसर्गिकरित्या आंबा पिकविण्यासाठी चार ते पाच दिवसाचा अवधी लागतो. यामुळे आंबा तयार होऊन विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पूर्वी ५० ते ६० हजार क्विंटल आंब्याची विक्री होत होती.