शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

अक्षयतृतीयेसाठी ३० हजार क्विंटल आंबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:12 IST

अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.

ठळक मुद्देकार्बाईडमुळे विक्री अर्ध्यावर : आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून फळांचा राजा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अक्षयतृतीयेपासून आंब्याच्या रसाळीला सुरवात होते. या दिवसासाठी मोेठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होते. यामुुळे स्थानिक व्यापारी आंब्याची आयात करतात. यावर्षी ३० हजार क्विंटल आंब्यांची आयात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमधून आंबा यवतमाळात आला आहे.यावर्षी दक्षिणात्य आंब्याची सर्वाधिक चलती आहे. या स्पर्धेत गावरान आंबा मागे पडला आहे. सध्या बाजारात आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूतून येणारा अांबा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. यामध्ये बैगनपल्ली, तोतापुरी, लालबाग, चरखुस आणि हापूस आंब्याचा समावेश आहे. एक हजार कॅरेट बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. एका कॅरेटमध्ये २७ ते ३० किलो आंबे असतात. यानुसार ३० हजार क्विंटल आंब्यांची आवक बाजारात झाली आहे. त्याची विक्री करण्यासाठी २५० हातगाड्या आहेत. तर या तुलनेत गावरान आंबा मोजकाच बाजारात आला आहे. ६० ते १०० रूपये किलोपर्यंत आंब्याचे दर आहे. दक्षिणात्य आंब्याच्या स्पर्धेत गावरात आंबा असला तरी गावरान आंब्याला सर्वाधिक मागणी असते. मात्र गावरान आंबा बाजारात उपलब्धच होत नाही.अन्न व औषधी प्रशासन विभाग आहे तरी कुठे ?यवतमाळात कार्बाईडने पिकविलेली फळे सर्रास बाजारात विकली जात आहे. या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. रात्री हिरव्या कंच दिसणाऱ्या कैºया सकाळी पिवळ्या धम्म दिसतात. अर्थात त्या पिकलेला आंबा म्हणून ग्राहकांना थोपविल्या जातात. अशीच अवस्था बहुतांश फळांची आहे. परंतु त्यानंतरही अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रुट मार्केटमध्ये धाड घालणे तर दूर साधी भेट दिल्याचेही ऐकिवात नाही. या अधिकाऱ्यांनी जणू फळविक्रेत्यांना नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याची खुली सूट दिल्याचे दिसते. नगरपरिषदेचा आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करतो आहे.कृत्रिम पिकविण्यावर बंदीआंब्याला कृत्रिमरीत्या पिकविण्यावर बंदी आहे. नैसर्गिकरित्या आंबा पिकविण्यासाठी चार ते पाच दिवसाचा अवधी लागतो. यामुळे आंबा तयार होऊन विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. पूर्वी ५० ते ६० हजार क्विंटल आंब्याची विक्री होत होती.