शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इसापूर जलाशयात २५ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: September 16, 2015 03:14 IST

उमरखेड तालुक्यातील इसापूर जलाशयात सध्या केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसाची प्रतीक्षा : १५ हजार हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न मुळावा : उमरखेड तालुक्यातील इसापूर जलाशयात सध्या केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील १५ हजार ९३७ हेक्टर जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलाशयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के पाणीसाठा राखीव ठेऊन सिंचनासाठी पाणी सोडण्याचा अधिकार कार्यकारी अभियंत्यांकडे आहे. आता पावसाळा संपत आला असताना जलाशयात पाणीसाठा न वाढल्यास सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. जलाशयाच्या डाव्या कालव्याची लांबी ८४ किलोमीटर आहे. विदर्भातील उमरखेड, मुळावा, ढाणकी, बिटरगाव या भागातून जातो. एकूण १५ हजार ९३७ हेक्टर जमीन या कालव्यांतर्गत बारमाही व हंगामी ओलित होते. उजवा कालवा मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यातून बाळापूर, हदगाव, भोकर, कळमनूरी, किनवट या भागातून जातो. या कलव्याची लांबी १८५ किलोमीटर एवढी आहे. या कालव्यातून सुमारे ७९ हजार ७०२ हेक्टर जमिनीमध्ये सिंचन केले जाते. जलाशयाची एकूण क्षमता १२७९.०६३१ दलघमी एवढी असून, त्यापैकी ९६४.९५४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. आज रोजी २४२.०० दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. किमान ५० टक्के पाणीसाठा राखीव ठेऊन सिंचनासाठी देण्याचे अधिकार कार्यकारी अभियंत्यांकडे असल्याचीे माहिती शाखाधिकारी गणेश भडबन्सी यांनी दिली. जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध न झाल्यास मराठवाडा व विदर्भातून ९५ हजार ६३९ हेक्टर जमिनीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल यामुळे बुडण्याचा तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. परंतु अद्यापही परिसरातील शेतकऱ्यांना जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, अशी आशा आहे. यावर्षी पावसाळ््यात पुरेसा पाऊस न झाल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)