शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

अडते व मापाऱ्यांच्या बंदने २५ कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: December 22, 2014 22:55 IST

शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली अडत रद्द करण्यात यावी आणि मापाऱ्यांचे मापार दर रद्द करावे, असा आदेश पणन संचालकांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले.

यवतमाळ : शेतकऱ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली अडत रद्द करण्यात यावी आणि मापाऱ्यांचे मापार दर रद्द करावे, असा आदेश पणन संचालकांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. या विरोधात आवाज उठवत अडते आणि मापाऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला. यामुळे जिल्ह्याची उलाढाल ठप्प झाली. बंदचा फटका शेतकऱ्यांनाही बसला.कृषीचे उत्पादन पूर्णत: निसर्गावर विसंबून आहे. कृषी उत्पादकाला उत्पादन खर्चावर आधारित मूल्य मिळत नाही. यामुळे कृषिमाल उत्पादकाचे खच्चीकरण होत असल्याचा निर्वाळा देत पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारी अडत रद्द करून ती खरेदीदारांकडून वसूल करावी, असे आदेश काढले होते. यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळणार होता. पणन संचालकांनी घेतलेल्या निर्णयावर अडते आणि मापाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत निर्णयाला विरोध दर्शविला. त्यामुळे सोमवारी दिवसभर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. परिणामी कामकाज दिवसभर थांबले होते. यामुळे जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनची २५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील दोन हजार अडते आणि मापाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. यामुळे हमालांच्या हातालाही काम मिळाले नाही. दरम्यान, सहकार मंत्र्यांच्या आश्वासनानंतर दुपारी निर्णय स्थगित करण्यात आला. मंगळवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्या पूर्ववत होऊन खरेदी-विक्रीचे व्यवहार पुन्हा सुरू होणार आहे.व्यापारी व अडत्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेश खेवले यांना सादर करण्यात आले. चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, सचिव राजेश निमोदिया, अडते संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पवार, उपाध्यक्ष मोहंमद खालीद, मनिष जिरापूरे, विजय मुंधडा, निकेश लोढाया यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. दरम्यान, अडत संदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्यापाऱ्यांचा बंद असल्याची माहिती शेतकऱ्यांना नव्हती. त्यामुळे काही जण आपला माल विक्रीसाठी घेऊन आले होते. त्यांची गैरसोय झाली. (शहर वार्ताहर)