कत्तलखान्याकडे जाणाऱ्या २२ जनावरांची सुटका
By Admin | Updated: June 13, 2016 00:55 IST2016-06-13T00:55:27+5:302016-06-13T00:55:27+5:30
पांढरकवडा : अवैधरीतीने २२ जनावरे भरून हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जाणारा ट्रकपोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील झुंजारपूर या गावाजवळ पडकला.

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या २२ जनावरांची सुटका
पांढरकवडा : अवैधरीतीने २२ जनावरे भरून हैदराबादच्या कत्तलखान्याकडे जाणारा ट्रकपोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील झुंजारपूर या गावाजवळ पडकला. ही घटना शनिवारी रात्री २.१५ वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस उपनिरीक्षक संतोष माने व त्यांचे सहकारी राष्ट्रीय महामार्गावर गस्त करीत होते. तेथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या केळापूर ते झुंजारपूर या गावादरम्यान त्यांना एम.एच.४०-वाय.०९५१ हा ट्रक नागपूरवरून हैदराबादकडे जाताना त्यांना दिसला. या ट्रकमध्ये काही तरी अवैध वाहतूक होत असल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांनी भरधाव जाणाऱ्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला. परंतु तो न थांबल्यामुळे त्याचा पाठलाग करून पोलिसांनी तो ट्रकपकडला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये २२ जनावरे दाटीवाटीने भरून असल्याचे आढळून आले.
ही जनावरे कामठी येथूनट्रकमध्ये भरण्यात आली. ही सर्व जनावरे भरून आलेला हा ट्रक राष्ट्रीय महामार्गाने नागपूर, हिंगणघाट, जाम, वडकी, वडनेर, वडकी, करंजी, पांढरकवडामार्गे हैदराबादला चालला होता. परंतु डाका पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी केळापूर- झुंजारपूर दरम्यान या ट्रकला पकडून २२ जनावरांना जीवदान दिले. ही सर्व जनावरे येथील गोरक्षण केंद्राकडे सुपुर्द करण्यात आली. पोलिसांनी रेशनखान शब्बीरखान रा.कामठी या ट्रकचालकासह जितू प्रेमलाल मनवर याला ताब्यात घेतले. ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षकसंतोष माने व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहे. पोलिसांनी पकडलेली ही जनावरे चोरीची असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)