शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

वर्षभरात १७ जिल्ह्यात २१०० बालमृत्यू; सर्वाधिक नाशिकमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:56 AM

बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनाची यादी लांबलचक आहे. तरीही राज्यातील बालमृत्यूचा आलेख चढता आहे.

ठळक मुद्दे अमरावती तिसऱ्या क्रमांकावर नवसंजीवनी योजनेचे फलित काय?

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनाची यादी लांबलचक आहे. तरीही राज्यातील बालमृत्यूचा आलेख चढता आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यात २१०६ बालमृत्यूची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ४५१ नाशिकमधील आहेत. त्या खालोखाल नंदूरबार ४२६, तर अमरावती जिल्ह्यात ४०९ बालमृत्यू झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २९ मे रोजी गाभा समितीच्या बैठकीनिमित्त तयार केलेल्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.नवसंजीवनी योजना राबविल्या जात असलेल्या जिल्ह्यातील बालमृत्यूचे आकडे आरोग्यसह विविध विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. गर्भवती माता ते सहा वर्षे वयापर्यंतच्या बालकांच्या आरोग्यासाठी या विभागामार्फत योजना राबविल्या जातात. पोषण आहार, औषधोपचार, नियमित तपासणी याशिवाय आर्थिक मदतीच्या योजना आहेत. यानंतरही बालमृत्यू थांबले नाही.

गर्भवतींकडे होतेय दुर्लक्षप्रशासनातील यंत्रणेकडून गर्भवती माता ते बालकांपर्यंत योजनेचा लाभ पोहचत नाही, अशी ओरड आहे. गर्भवतीची योग्य आरोग्य तपासणी होत नाही, प्रसूतीनंतर बाळाची योग्य काळजी घेण्यात येत नाही. परिणामी त्यांना गंभीर आजार होतात. शिवाय योग्य आहार मिळत नाही. यातूनच बालकाचा मृत्यू होत असल्याचे सांगितले जाते.

‘आरोग्य’च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हनवसंजीवनी योजने अंतर्गत येणाºया १७ जिल्ह्यांमध्ये २०१८-१९ या वर्षात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील २१०६ बालकांचा मृत्यू झाला. आदिवासीबहुल हे जिल्हे आहेत. अतिसंवेदनशील जिल्हे असल्याने त्याठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने अधिक योजना हाती घेण्यात आल्या आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्यातही १४ बालमृत्यूची नोंद झाली आहे. मात्र याविषयी सरकार गंभीर नसल्याचा आरोप आरोग्य क्षेत्रात कार्य करत असलेल्या लोकांकडून केला जात आहे.२०१८-१९ मधील बालमृत्यूनाशिक जिल्हा ४५१, नंदूरबार ४२६, अमरावती ४०९, पालघर १९९, चंद्रपूर १०१, धुळे ९८, यवतमाळ ७७, ठाणे ६६, गडचिरोली ६२, अहमदनगर ५३, गोंदिया ४६, नांदेड ३९, पुणे ३१, रायगड १८, जळगाव १६ व नागपूर १४. गर्भवती माता आणि बालकांसाठी योजना राबवित असलेल्या आरोग्यसह इतर विभागात समन्वय नाही. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे सांगितले जाते.बालमृत्यू रोखण्यासाठी गर्भवती मातेची नियमित तपासणी गरजेची आहे. प्रसूतीनंतर बाळाचे वजन, उंची, आहार आदी बाबी सातत्याने तपासण्याची गरज आहे. ही सर्व जबाबदारी आरोग्य यंत्रणेची आहे. शिवाय पालकांनीही जागरूक असावे.- डॉ. अभिजित मोरे, सहसमन्वयक, जनआरोग्य अभियान

टॅग्स :Deathमृत्यू