शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
2
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
3
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
4
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
5
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
6
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
7
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
8
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
9
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
10
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
11
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
12
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
13
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
14
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
15
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
16
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
17
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
18
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
19
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
20
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी

यवतमाळ जिल्ह्यात २१ महसूल मंडळांना बसला अतिवृष्टीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:27 IST

जिल्ह्यात ३९.७० मिमी. पावसाची नोंद : चार जनावरे दगावली, पाच घरांची पडझड, सव्वादोनशे हेक्टरवरील ज्वारी, तीळ, भुईमूग पिकाला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यात मंगळवारी तब्बल ३९.७० मिमी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. २१ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे, यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांना देखील फटका बसला.

यवतमाळ तालुक्यातील हिवरी ६८.२५, कोळंबी ६६, दारव्हा तालुक्यातील दारव्हा १००.२५, चिखली ७०.२५, मांगकिन्ही ८०.५०, लोही ७०.२५, बोरी ६९, लाडखेड ८५.७५, महागाव ७९.२५, आर्णी तालुक्यातील आर्णी ७९.२५, जवळा ७९.२५, बोरगाव ७९.२५, पुसद मधील शेंबाळपिंपरी ७६,७५, खंडाळा ८३.७५, उमरखेड तालुक्यातील मुळावा ६६.७५, विद्धूळ ८१.२५, मारेगाव तालुक्यातील जळका ६५.२५, हारी तालुक्यातील खडकडोह ९४.२५, मुकुटबन ७५.२५, केळापूर तालुक्यातील करंजी ६५.२५ आणि राळेगाव तालुक्यातील वरध मंडळात ६५.२५ मिमी. इतका पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे यवतमाळ, केळापूर तालुक्यातील पाच घरांची पडझड झाली. वणी, मारेगाव, झरी येथे तीन जनावरे दगावली. तर राळेगाव तालुक्यातील मांडवा येथे वीज कोसळून नाना लोणकर यांचा बैल ठार झाला. आर्णी तालुक्यातील आठ गावांतील १८० आणि केळापूर तालुक्यातील सात गावांतील ३५ हेक्टरवरील तीळ, भूईमूग, मूग, ज्वारी पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. 

पेरणीसाठी घाई नकोजिल्ह्यात दाखल झालेला मान्सून विक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून केले जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून जोरदार बरसेल.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रियजूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जून महिन्यात चांगला पाऊस बरसल्या नंतरच पेरणी करावी लागणार आहे. यापूर्वी १९६१, ला २१ मे रोजी मान्सून आला होता. १९६२ ला १२ मे रोजी मान्सून आला. १९६४ मध्ये २६ मे ला आणि २०२५ ला २६ मे ला मान्सून दाखल झाला आहे. तब्बल ६१ वर्षांनंतर हा मान्सून राज्यात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात आणि विदर्भात गत काही वर्षात एकाच दिवशी मान्सून दाखल होत आहे.

जिल्ह्यात वीक मान्सूनजिन्ह्यात दरवर्षी ७ ते १० जूनव्या सुमारास मान्सून सक्रिय होतो. यानंतर पावसात खंड पडतो. या वर्षी आठवडाभरापूर्वी मान्सूनचे वारे सक्रिय झाले. २६ तारखेला मान्सून विदर्भात आणि महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यात दाखल झाला आहे. प्रारंभी वीक स्वरूपाचा मान्सून आहे. ३१ मेपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. १ तारखेपासून पावसाचा जोर कमी होऊन अधून मधून पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या काळात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करता येणार आहेत. मात्र, पेरणी करणे सर्वाधिक धोकादायक असणार आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळRainपाऊस