लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यात मंगळवारी तब्बल ३९.७० मिमी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली. २१ महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे, यात शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांना देखील फटका बसला.
यवतमाळ तालुक्यातील हिवरी ६८.२५, कोळंबी ६६, दारव्हा तालुक्यातील दारव्हा १००.२५, चिखली ७०.२५, मांगकिन्ही ८०.५०, लोही ७०.२५, बोरी ६९, लाडखेड ८५.७५, महागाव ७९.२५, आर्णी तालुक्यातील आर्णी ७९.२५, जवळा ७९.२५, बोरगाव ७९.२५, पुसद मधील शेंबाळपिंपरी ७६,७५, खंडाळा ८३.७५, उमरखेड तालुक्यातील मुळावा ६६.७५, विद्धूळ ८१.२५, मारेगाव तालुक्यातील जळका ६५.२५, हारी तालुक्यातील खडकडोह ९४.२५, मुकुटबन ७५.२५, केळापूर तालुक्यातील करंजी ६५.२५ आणि राळेगाव तालुक्यातील वरध मंडळात ६५.२५ मिमी. इतका पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे यवतमाळ, केळापूर तालुक्यातील पाच घरांची पडझड झाली. वणी, मारेगाव, झरी येथे तीन जनावरे दगावली. तर राळेगाव तालुक्यातील मांडवा येथे वीज कोसळून नाना लोणकर यांचा बैल ठार झाला. आर्णी तालुक्यातील आठ गावांतील १८० आणि केळापूर तालुक्यातील सात गावांतील ३५ हेक्टरवरील तीळ, भूईमूग, मूग, ज्वारी पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
पेरणीसाठी घाई नकोजिल्ह्यात दाखल झालेला मान्सून विक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून केले जात आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून जोरदार बरसेल.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रियजूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जून महिन्यात चांगला पाऊस बरसल्या नंतरच पेरणी करावी लागणार आहे. यापूर्वी १९६१, ला २१ मे रोजी मान्सून आला होता. १९६२ ला १२ मे रोजी मान्सून आला. १९६४ मध्ये २६ मे ला आणि २०२५ ला २६ मे ला मान्सून दाखल झाला आहे. तब्बल ६१ वर्षांनंतर हा मान्सून राज्यात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात आणि विदर्भात गत काही वर्षात एकाच दिवशी मान्सून दाखल होत आहे.
जिल्ह्यात वीक मान्सूनजिन्ह्यात दरवर्षी ७ ते १० जूनव्या सुमारास मान्सून सक्रिय होतो. यानंतर पावसात खंड पडतो. या वर्षी आठवडाभरापूर्वी मान्सूनचे वारे सक्रिय झाले. २६ तारखेला मान्सून विदर्भात आणि महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यात दाखल झाला आहे. प्रारंभी वीक स्वरूपाचा मान्सून आहे. ३१ मेपर्यंत जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. १ तारखेपासून पावसाचा जोर कमी होऊन अधून मधून पाऊस पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या काळात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करता येणार आहेत. मात्र, पेरणी करणे सर्वाधिक धोकादायक असणार आहे.