शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

शिळे अन्न खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा

By विशाल सोनटक्के | Published: May 22, 2024 6:33 PM

म्हसोबा तांडा येथील घटना : आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

यवतमाळ : आर्णी  तालुक्यातील म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर जेवणाचे आयोजन होते. त्या जेवणातील शिळे अन्न बुधवारी सकाळी खाल्ल्याने २१ जणांना विषबाधा झाली असून, या सर्वांवर आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

म्हसोबा तांडा येथे मंगळवारी धार्मिक पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण ठेवण्यात आले होते. त्यातील बरेचसे जेवण शिल्लक राहिले. हे जेवण बुधवारी सकाळी काहींनी घेतले. शिळे अन्न खाल्ल्यानंतर काही वेळाने यातील काहींना जुलाब तसेच उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने या भाविकांना तातडीने दुपारी दोनच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय, आर्णी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले.

यामध्ये प्रगती संतोष जाधव (२१), बजरंग प्रल्हाद जाधव (३५), किरण नीलेश जाधव (३८), उकंडा सूर्यभान राठोड (५०), पल्लवी बजरंग जाधव (३०), सुरेखा बाबुलाल राठोड (४५), बेबी उकंडा राठोड (४०), जगदीश बाबूलाल राठोड (३२), भारत हरिश्चंद जाधव (३२), दर्पण भारत जाधव (६), नीलेश दिलीप जाधव (३५), भारती दिनेश राठोड (३०), उदयसिंग सुदाम चव्हाण (४५), रेखा गणेश राठोड (४०), नम्रता गणेश राठोड (१२), विजू गणेश जाधव (७), निर्मला दिलीप जाधव (५०), भारत संतोष जाधव (२०), दिलीप रामसिंग जाधव (७५), पूजा प्रकाश राठोड (२७) आणि सीमा जगदीश राठोड (२२) यांचा समावेश आहे. सर्वांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील भवरे यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी म्हसोबा तांडा येथे भेट देऊन आढावा घेतला.

 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाYavatmalयवतमाळ