शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:14 IST

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत.

यवतमाळ/मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. गेल्याच महिन्यात केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले होते. यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. आता, महाराष्ट्रातील एका माजी खासदारानेही बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे. भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भारतीय राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. यापूर्वी ते आम आदमी पक्षाचे काम करत.

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत राठोड यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आम आदमी पार्टी ही देशातील चांगली पार्टी आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांचं कामही चांगलं आहे. परंतु, त्याहीपेक्षा भारत राष्ट्र समिती अधिक चांगली असून, ती गोरगरीब, दलित आणि खास करून शेतकऱ्यांची पार्टी आहे. गोरगरीब आणि शेतकरी यांसंदर्भात अनेक चांगल्या योजना या पक्षाकडे आहेत. या सर्व बाबींचा विचार करून मी इकडे आकर्षित झालो. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंदर्भात जाण असणारे एकमेव नेते म्हणजे चंद्रशेखर राव आहेत असा विश्वासही राठोड यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, भटके विमुक्त, बंजारा, ओबीसी यांच्यासाठी ते कायम आंदोलन, मोर्चे काढत असतात. राठोड यांना कायम सत्तेच्या परिघात राहायला आवडते, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच केली जाते. हरिभाऊ राठोड भाजपकडून दोन वेळा खासदार राहिले. मनमोहन सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर सभागृहात गैरहजर राहून राठोड यांनी भाजपला तोंडघशी पाडले. त्यांनतर भाजपने राठोड यांना बेदखल केले.  यवतमाळमधून आता ते भारतीय राष्ट्र समितीचं काम करणार आहेत.  

तेलंगणा सरकारच्या अनेक योजना

तेलंगणा सरकार सध्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत असून कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये विमा योजनाही लागू केली आहे. मुलगी जन्माला आल्यास के, सी. आर. किट तसेच १३००० रुपये आर्थिक मदत देते. गरिबांसाठी वस्ती दवाखाना सुरू आहे. तर, दलित बंधू योजनेतून उद्योगधंद्यासाठी १० लाख रुपये मदत देण्याची योजनाही सध्या तेलंगणातील केसीआर सरकार देत असल्याचे राठोड यांनी सांगितले.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाAAPआपYavatmalयवतमाळPoliticsराजकारणBJPभाजपाMember of parliamentखासदार