शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:14 IST

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत.

यवतमाळ/मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. गेल्याच महिन्यात केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले होते. यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. आता, महाराष्ट्रातील एका माजी खासदारानेही बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे. भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भारतीय राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. यापूर्वी ते आम आदमी पक्षाचे काम करत.

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत राठोड यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आम आदमी पार्टी ही देशातील चांगली पार्टी आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांचं कामही चांगलं आहे. परंतु, त्याहीपेक्षा भारत राष्ट्र समिती अधिक चांगली असून, ती गोरगरीब, दलित आणि खास करून शेतकऱ्यांची पार्टी आहे. गोरगरीब आणि शेतकरी यांसंदर्भात अनेक चांगल्या योजना या पक्षाकडे आहेत. या सर्व बाबींचा विचार करून मी इकडे आकर्षित झालो. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंदर्भात जाण असणारे एकमेव नेते म्हणजे चंद्रशेखर राव आहेत असा विश्वासही राठोड यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, भटके विमुक्त, बंजारा, ओबीसी यांच्यासाठी ते कायम आंदोलन, मोर्चे काढत असतात. राठोड यांना कायम सत्तेच्या परिघात राहायला आवडते, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच केली जाते. हरिभाऊ राठोड भाजपकडून दोन वेळा खासदार राहिले. मनमोहन सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर सभागृहात गैरहजर राहून राठोड यांनी भाजपला तोंडघशी पाडले. त्यांनतर भाजपने राठोड यांना बेदखल केले.  यवतमाळमधून आता ते भारतीय राष्ट्र समितीचं काम करणार आहेत.  

तेलंगणा सरकारच्या अनेक योजना

तेलंगणा सरकार सध्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत असून कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये विमा योजनाही लागू केली आहे. मुलगी जन्माला आल्यास के, सी. आर. किट तसेच १३००० रुपये आर्थिक मदत देते. गरिबांसाठी वस्ती दवाखाना सुरू आहे. तर, दलित बंधू योजनेतून उद्योगधंद्यासाठी १० लाख रुपये मदत देण्याची योजनाही सध्या तेलंगणातील केसीआर सरकार देत असल्याचे राठोड यांनी सांगितले.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाAAPआपYavatmalयवतमाळPoliticsराजकारणBJPभाजपाMember of parliamentखासदार