शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

२ वेळा भाजप खासदार राहिलेले हरिभाऊ राठोड KCR यांच्यासोबत, BRS पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:14 IST

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत.

यवतमाळ/मुंबई - तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एंट्री घेतली आहे. गेल्याच महिन्यात केसीआर यांची नांदेडमध्ये भव्य सभा झाली. यावेळी त्यांनी 'अब कि बार किसान सरकार'चा नारा दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले होते. यावेळी अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. आता, महाराष्ट्रातील एका माजी खासदारानेही बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे. भटके विमुक्त समाजाचे राष्ट्रीय नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भारतीय राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला. यापूर्वी ते आम आदमी पक्षाचे काम करत.

भाजप, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष असा प्रवास करीत हरिभाऊ आता ‘बीआरएस’मध्ये दाखल झाले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत राठोड यांनी बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, आम आदमी पार्टी ही देशातील चांगली पार्टी आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसंदर्भात त्यांचं कामही चांगलं आहे. परंतु, त्याहीपेक्षा भारत राष्ट्र समिती अधिक चांगली असून, ती गोरगरीब, दलित आणि खास करून शेतकऱ्यांची पार्टी आहे. गोरगरीब आणि शेतकरी यांसंदर्भात अनेक चांगल्या योजना या पक्षाकडे आहेत. या सर्व बाबींचा विचार करून मी इकडे आकर्षित झालो. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंदर्भात जाण असणारे एकमेव नेते म्हणजे चंद्रशेखर राव आहेत असा विश्वासही राठोड यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, भटके विमुक्त, बंजारा, ओबीसी यांच्यासाठी ते कायम आंदोलन, मोर्चे काढत असतात. राठोड यांना कायम सत्तेच्या परिघात राहायला आवडते, अशी टीका त्यांच्यावर नेहमीच केली जाते. हरिभाऊ राठोड भाजपकडून दोन वेळा खासदार राहिले. मनमोहन सिंग सरकार अल्पमतात आल्यानंतर सभागृहात गैरहजर राहून राठोड यांनी भाजपला तोंडघशी पाडले. त्यांनतर भाजपने राठोड यांना बेदखल केले.  यवतमाळमधून आता ते भारतीय राष्ट्र समितीचं काम करणार आहेत.  

तेलंगणा सरकारच्या अनेक योजना

तेलंगणा सरकार सध्या शेतकऱ्यांना वीज मोफत देत असून कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये विमा योजनाही लागू केली आहे. मुलगी जन्माला आल्यास के, सी. आर. किट तसेच १३००० रुपये आर्थिक मदत देते. गरिबांसाठी वस्ती दवाखाना सुरू आहे. तर, दलित बंधू योजनेतून उद्योगधंद्यासाठी १० लाख रुपये मदत देण्याची योजनाही सध्या तेलंगणातील केसीआर सरकार देत असल्याचे राठोड यांनी सांगितले.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाAAPआपYavatmalयवतमाळPoliticsराजकारणBJPभाजपाMember of parliamentखासदार