शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

भूमिगत गटारांसाठी १९६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:09 IST

शहरातील भूमिगत गटारांसाठी १९६ कोटींच्या योजनेला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर ४५ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देयवतमाळ शहर : दीड महिन्यात कार्यादेश काढण्याची नगरविकासची सूचना

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील भूमिगत गटारांसाठी १९६ कोटींच्या योजनेला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर ४५ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २५ टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थात नगरपरिषदेला उभारावा लागणार आहे.केंद्र सरकारने अमृत अभियान हाती घेतले आहे. या अभियानात ज्या शहरांचा समावेश आहे, त्या ठिकाणी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सोबतच भूमिगत गटार, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन आणि हरित क्षेत्र विकास या पायाभूत सुविधांचा सहभाग आहे. अमृत योजनेतील २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम यवतमाळात सुरू झाले आहे. यासोबतच भूमिगत गटारनिर्मितीचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र या प्रकल्पाला मंजुरी मिळायची होती. आता नगरविकास विभागाने २६ मार्च रोजी यवतमाळ शहरातील भूमिगत गटार योजनेला मंजुरी दिली. संपूर्ण शहरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १९६ कोटी रुपये लागणार आहे. यातील ५० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे, तर २५ टक्केचा वाटा राज्य शासनाचा राहणार आहे. उर्वरित २५ टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थात यवतमाळ नगरपरिषदेला उभारावा लागणार आहे.या योजनेत केंद्र सरकारचे ९८ कोटी ३८ लाख रुपये, राज्य शासनाचे ४९ कोटी १९ लाख रुपये तर यवतमाळ नगरपरिषदेला ४९ कोटी १९ लाख रुपये निधी उभारावा लागणार आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधी चिन्हांकित करण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे सचिव पां.जो. जाधव यांनी दिली आहे. भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यान्वित यंत्रणेवर राहणार आहे. केंद्र सरकार आपल्या वाट्याचा निधी टप्प्याटप्प्यात वळता करणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात ४० आणि तिसºया टप्प्यातही ४० टक्के निधी देणार आहे. हे काम ठराविक कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे.यवतमाळातील रस्त्यांचे पुन्हा खोदकामयवतमाळ शहरात गत काही दिवसांपासून विकास कामांसाठी रस्त्यांचे प्रचंड खोदकाम होत आहे. आर्णी मार्गावर चौपदरीकरणासाठी प्रचंड खोदकाम झाले. त्यानंतर बेंबळा जलवाहिनीसाठी शहराच्या विविध भागात खोदकाम करण्यात आले. आता भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील रस्ते पुन्हा खोदले जाणार आहे. त्यामुळे यवतमाळकरांना आणखी काही दिवस खडतर प्रवास करावा लागणार आहे.