शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

भूमिगत गटारांसाठी १९६ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:09 IST

शहरातील भूमिगत गटारांसाठी १९६ कोटींच्या योजनेला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर ४५ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देयवतमाळ शहर : दीड महिन्यात कार्यादेश काढण्याची नगरविकासची सूचना

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : शहरातील भूमिगत गटारांसाठी १९६ कोटींच्या योजनेला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर ४५ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २५ टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थात नगरपरिषदेला उभारावा लागणार आहे.केंद्र सरकारने अमृत अभियान हाती घेतले आहे. या अभियानात ज्या शहरांचा समावेश आहे, त्या ठिकाणी २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सोबतच भूमिगत गटार, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन आणि हरित क्षेत्र विकास या पायाभूत सुविधांचा सहभाग आहे. अमृत योजनेतील २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम यवतमाळात सुरू झाले आहे. यासोबतच भूमिगत गटारनिर्मितीचे काम हाती घेतले जाणार होते. मात्र या प्रकल्पाला मंजुरी मिळायची होती. आता नगरविकास विभागाने २६ मार्च रोजी यवतमाळ शहरातील भूमिगत गटार योजनेला मंजुरी दिली. संपूर्ण शहरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १९६ कोटी रुपये लागणार आहे. यातील ५० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे, तर २५ टक्केचा वाटा राज्य शासनाचा राहणार आहे. उर्वरित २५ टक्के निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला अर्थात यवतमाळ नगरपरिषदेला उभारावा लागणार आहे.या योजनेत केंद्र सरकारचे ९८ कोटी ३८ लाख रुपये, राज्य शासनाचे ४९ कोटी १९ लाख रुपये तर यवतमाळ नगरपरिषदेला ४९ कोटी १९ लाख रुपये निधी उभारावा लागणार आहे. १४ व्या वित्त आयोगातील निधी चिन्हांकित करण्याच्या सूचना नगरविकास विभागाचे सचिव पां.जो. जाधव यांनी दिली आहे. भूमिगत गटार योजना कार्यान्वित करण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यान्वित यंत्रणेवर राहणार आहे. केंद्र सरकार आपल्या वाट्याचा निधी टप्प्याटप्प्यात वळता करणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात ४० आणि तिसºया टप्प्यातही ४० टक्के निधी देणार आहे. हे काम ठराविक कालावधीत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे.यवतमाळातील रस्त्यांचे पुन्हा खोदकामयवतमाळ शहरात गत काही दिवसांपासून विकास कामांसाठी रस्त्यांचे प्रचंड खोदकाम होत आहे. आर्णी मार्गावर चौपदरीकरणासाठी प्रचंड खोदकाम झाले. त्यानंतर बेंबळा जलवाहिनीसाठी शहराच्या विविध भागात खोदकाम करण्यात आले. आता भूमिगत गटार योजनेसाठी शहरातील रस्ते पुन्हा खोदले जाणार आहे. त्यामुळे यवतमाळकरांना आणखी काही दिवस खडतर प्रवास करावा लागणार आहे.