शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

१८ गावांचे पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:18 PM

पाऊस कमी झाल्याने कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपाचा आधार तुटला असतानाच पाणी पुरवठा योजनेचीही वीज कापण्यात आली. परिणामी मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील पाणी बंद झाले आहे.

ठळक मुद्देथकीत बिलासाठी वीज पुरवठा तोडला : मालखेड उपकेंद्राची धडक कारवाई

पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : पाऊस कमी झाल्याने कोरड्या पडलेल्या विहिरी आणि हातपंपाचा आधार तुटला असतानाच पाणी पुरवठा योजनेचीही वीज कापण्यात आली. परिणामी मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील पाणी बंद झाले आहे. भर हिवाळ्यात नागरिकांना दिवस-रात्र पाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनेचे थकीत बिल भरले नसल्याने वीज पुरवठा तोडण्यात आला आहे.उत्तरवाढोणा परिसरातील सोनखास, हेटी, सोनवाढोणा, घुई, मालखेड आदी गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. हातपंपाची पातळी कमालीची खोल गेली आहे. याशिवाय इतर गावांची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. अशातच पाणीपुरवठा योजनेची वीज कापण्यात आली. १८ गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.मालखेड वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या १८ गावातील ग्रामपंचायतीच्या नळ योजनांकडे मोठी रक्कम थकीत झाली आहे. वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायतीने रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे अशा योजनांची वीज चार दिवसांपूर्वी कापण्यात आली. या गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. आता नागरिकांना गावशिवारात असलेल्या स्रोतांवरून पाणी आणावे लागत आहे. आतापासूनच सायकल, मोटरसायकल, गाडीबैलाद्वारे पाणी आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच या परिसरातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. प्रशासनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.सिंगनडोहचे पाणी सिंचनासाठीउत्तरवाढोणा परिसरात असलेल्या सिंगनडोह तलावातील पाणी सिंचनासाठी ओढले जात आहे. तलावाच्या आजूबाजूला असलेल्या शेतासाठी पाण्याचा उपसा केला जात आहे. याविषयी पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पाण्याचा वापर थांबविण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यानंतरही उपसा सुरूच आहे. भविष्यात निर्माण होणारा पाणीप्रश्न लक्षात घेता या उपाययोजना केल्या जात आहे. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.