शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कीटकनाशकाने घेतले 18 जीव, मृत्यूंना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाच जबाबदार - किशोर तिवारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 15:01 IST

कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली.

यवतमाळ - जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर बोडअळी, गुलाबी बोडअळी, मलिबगचे प्रचंड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो यांसारख्या अतिविषारी 'कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली. या मृत्यू पडलेल्या शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सरकार प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देणार असल्याची व दवाखान्यावर आलेला संपूर्ण खर्च देणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच या मृत्यू तांडवाची सारी जबाबदारी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उच्च समितीच्या अहवालाच्या नावावर मांडण्याचा घाणेरडा व खोटारडा प्रकार आपण हाणून पाडणार असून, या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्याने यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सरकारी नौकरीमधून हकालपट्टी करण्याची मागणीच तिवारी यांनी केली आहे  यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मिशनने उमरखेड पुसद, आर्णी, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ, राळेगाव, कळंब, मारेगाव, केळापूर व वणी या ठिकाणी मागील चार दिवसांत दौरे करून माहिती जुळवल्यानंतर जिल्ह्यात सुमारे ७५० रुग्णांमध्ये आदिवासी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समावेश असून, आतापर्यंत 17पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये कीटकनाशकाची बाधा झालेले निरपराध जीव गमावले असून, यामध्ये जीवगांवचे शंकरराव आगलावे, आमलोनचे दत्ता टेकाम, शेंदूरघानींचे दीपक मडावी नायगांव गावचे दशरथ चव्हाण, कळंब शहराचे देविदास माडीवी, जामनी गावचे कैलाश पेंदोर, कळंब गावचे आयुब शेख, कळंबचे अनिल चव्हाण, घाटंजी गावाचे रमेश चिरावार, उचेगाव गावचे रवी राठोड, पहापळचे विठ्ठलराव पेरकेवार टेंभीचे विलासभाऊ मडावी, मारेगावचे वसंतराव  सिडाम, कालेगाव मारोतराव पिंपळकर, घोडधरा गावांतील दिवाकर घोसी, टाकळी गावचे शंकर कदम, मानोलीचा बंडूभाऊ सोनुर्ले, राळेगावचे सावरगावचे गजाननराव फुलमाळी यांचा समावेश असून, जर आरोग्य विभाग व कृषी विभाग असाच झोपा काढत असल्यास या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.