शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कीटकनाशकाने घेतले 18 जीव, मृत्यूंना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाच जबाबदार - किशोर तिवारी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 15:01 IST

कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली.

यवतमाळ - जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर बोडअळी, गुलाबी बोडअळी, मलिबगचे प्रचंड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो यांसारख्या अतिविषारी 'कीटकनाशकाच्या फवारणीमुळे 16 शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात मृत्यू झाला असल्याची व 600च्या वर लोकांना विषबाधा झाली असल्याची माहिती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली. या मृत्यू पडलेल्या शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सरकार प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसानभरपाई देणार असल्याची व दवाखान्यावर आलेला संपूर्ण खर्च देणार असल्याची माहिती यावेळी दिली. तसेच या मृत्यू तांडवाची सारी जबाबदारी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उच्च समितीच्या अहवालाच्या नावावर मांडण्याचा घाणेरडा व खोटारडा प्रकार आपण हाणून पाडणार असून, या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्याने यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सरकारी नौकरीमधून हकालपट्टी करण्याची मागणीच तिवारी यांनी केली आहे  यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मिशनने उमरखेड पुसद, आर्णी, दिग्रस, दारव्हा, यवतमाळ, राळेगाव, कळंब, मारेगाव, केळापूर व वणी या ठिकाणी मागील चार दिवसांत दौरे करून माहिती जुळवल्यानंतर जिल्ह्यात सुमारे ७५० रुग्णांमध्ये आदिवासी शेतमजूर व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या समावेश असून, आतापर्यंत 17पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये कीटकनाशकाची बाधा झालेले निरपराध जीव गमावले असून, यामध्ये जीवगांवचे शंकरराव आगलावे, आमलोनचे दत्ता टेकाम, शेंदूरघानींचे दीपक मडावी नायगांव गावचे दशरथ चव्हाण, कळंब शहराचे देविदास माडीवी, जामनी गावचे कैलाश पेंदोर, कळंब गावचे आयुब शेख, कळंबचे अनिल चव्हाण, घाटंजी गावाचे रमेश चिरावार, उचेगाव गावचे रवी राठोड, पहापळचे विठ्ठलराव पेरकेवार टेंभीचे विलासभाऊ मडावी, मारेगावचे वसंतराव  सिडाम, कालेगाव मारोतराव पिंपळकर, घोडधरा गावांतील दिवाकर घोसी, टाकळी गावचे शंकर कदम, मानोलीचा बंडूभाऊ सोनुर्ले, राळेगावचे सावरगावचे गजाननराव फुलमाळी यांचा समावेश असून, जर आरोग्य विभाग व कृषी विभाग असाच झोपा काढत असल्यास या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.