शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

तीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 17:34 IST

राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

मंगेश चवरडोल

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नापिकी, कर्जाचा वाढत गेलेला डोंगर या विवंचनेत मागील तीन महिन्यांत वडकी परिसरात १५ शेतकरी आत्महत्या झाल्या. मात्र, सरकारच्या मदतीस केवळ तीन घटना पात्र ठरल्या आहेत. संकटाच्या या मालिकेमुळे हा परिसर हादरून गेला आहे.

राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मक्त्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आपली जीवनयात्रा संपविली. रोजगार मिळत नसल्याने शेतीकडे वळलेल्या या युवकांनी मृत्यूला कवटाळले. शेतात कसूनही केवळ नावावर शेती नसल्याने ते मदतीस पात्र ठरू शकले नाही.

वडिलांच्या आत्महत्येमुळे चिमुकले पोरके झाले. कुटुंबाची जबाबदारी घरातील महिलेवर आली. वृद्ध आई-वडिलांवर शेतात राबण्याची वेळ आली. शाळेत शिकण्याच्या वयात काही मुले शेतात काम करत आहेत. ही एक मोठी शोकांतिका आहे. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत १५ आत्महत्या झाल्या.

वडकी परिसरातील शेती निसर्गावरून अवलंबून आहे. खरिपात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसामुळे उत्पादन येत नाही. पेरणीसाठी लोगलेला खर्चही निघत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. पाल्यांचे शिक्षण कसे करावे, याची चिंता त्यांना सतावते. याच कारणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे सांगितले जाते.

शेतमाल निघण्यापूर्वीच कर्ज

पेरणी करण्यासाठी पैसा नसल्याने बहुतांश शेतकरी कापूस घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून रक्कम घेतात. निघणाऱ्या शेतमालाचा सौदा आधीच केला जातो. यासाठीचा दरही व्यापारी निश्चित करतात. पाच क्विंटल कापसाचा सौदा झाला असल्यास तो संपूर्ण कापूस व्यापारी घेऊन जातात. काही शेतकऱ्यांचा घरात आलेला संपूर्ण माल व्यापाऱ्यांच्या घशात जातो. याही कारणामुळे शेतकरी विवंचनेत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्या