शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

तीन महिन्यांत १५ शेतकरी आत्महत्या, मदतीस केवळ तीन पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 17:34 IST

राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.

मंगेश चवरडोल

यवतमाळ : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नापिकी, कर्जाचा वाढत गेलेला डोंगर या विवंचनेत मागील तीन महिन्यांत वडकी परिसरात १५ शेतकरी आत्महत्या झाल्या. मात्र, सरकारच्या मदतीस केवळ तीन घटना पात्र ठरल्या आहेत. संकटाच्या या मालिकेमुळे हा परिसर हादरून गेला आहे.

राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. मक्त्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आपली जीवनयात्रा संपविली. रोजगार मिळत नसल्याने शेतीकडे वळलेल्या या युवकांनी मृत्यूला कवटाळले. शेतात कसूनही केवळ नावावर शेती नसल्याने ते मदतीस पात्र ठरू शकले नाही.

वडिलांच्या आत्महत्येमुळे चिमुकले पोरके झाले. कुटुंबाची जबाबदारी घरातील महिलेवर आली. वृद्ध आई-वडिलांवर शेतात राबण्याची वेळ आली. शाळेत शिकण्याच्या वयात काही मुले शेतात काम करत आहेत. ही एक मोठी शोकांतिका आहे. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत १५ आत्महत्या झाल्या.

वडकी परिसरातील शेती निसर्गावरून अवलंबून आहे. खरिपात पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. कधी अतिवृष्टी तर कधी कमी पावसामुळे उत्पादन येत नाही. पेरणीसाठी लोगलेला खर्चही निघत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. पाल्यांचे शिक्षण कसे करावे, याची चिंता त्यांना सतावते. याच कारणामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे सांगितले जाते.

शेतमाल निघण्यापूर्वीच कर्ज

पेरणी करण्यासाठी पैसा नसल्याने बहुतांश शेतकरी कापूस घेणाऱ्या व्यापाऱ्यांकडून रक्कम घेतात. निघणाऱ्या शेतमालाचा सौदा आधीच केला जातो. यासाठीचा दरही व्यापारी निश्चित करतात. पाच क्विंटल कापसाचा सौदा झाला असल्यास तो संपूर्ण कापूस व्यापारी घेऊन जातात. काही शेतकऱ्यांचा घरात आलेला संपूर्ण माल व्यापाऱ्यांच्या घशात जातो. याही कारणामुळे शेतकरी विवंचनेत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीDeathमृत्यूfarmer suicideशेतकरी आत्महत्या