शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

१४ वर्षांत १३४ आत्महत्या

By admin | Updated: March 22, 2015 02:09 IST

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या व शेत मालाच्या पडत्या किंमतीमुळे संकटात सापडलेल्या तालुक्यातील १३४ शेतकऱ्यांनी ...

मारेगाव : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या व शेत मालाच्या पडत्या किंमतीमुळे संकटात सापडलेल्या तालुक्यातील १३४ शेतकऱ्यांनी आत्मघात करून जीवनयात्रा संपविली. गेल्या १४ वर्षांत त्यांनी आत्महत्या केल्या आहेत.गेल्या १४ वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या १३४ शेतकऱ्यांपैकी केवळ ४२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय शासकीय मदतीस पात्र ठरले आहे. त्यांना प्रत्येकी लाखांची मदत देण्यात आली आहे. निकषात न बसल्याच्या कारणामुळे ९२ शेतकरी कुटुंब या मदतीपासून वंचित राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला केवळ एक लाखाची मदत देताना शेत मालाला योग्य भाव, कर्जमाफी, बिनव्याजी कर्ज, भारनियमनमुक्ती, सिंचनाच्या सोयी, शेतीविषयक मार्गदर्शन या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्याप सुरू असताना यावर्षी पुन्हा नापिकीने भर घातली आहे. आधी अल्पवृष्टीने शेतकऱ्यांचा घात केला. त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना हादर बसला. त्यानंतर परतीच्या पावसाने घात केला. परतीच्या पावसात पुन्हा खरीपातील पिके संकटात सापडली आहे. खरीपातील भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी रबीवर भीस्त ठेवली.मात्र रबीनेही शेवटी घातच केला. रबी पीक ऐन जोमात असताना पुन्हा पावसाने दणका दिला. ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाने रबी पिकांना फटका बसला. ऐन सवंगणीच्या काळातच वादळाने गहू आणि हरभरा पिकाला दणका दिला. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)