शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

१४ वर्षांत १३४ आत्महत्या

By admin | Updated: March 22, 2015 02:09 IST

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या व शेत मालाच्या पडत्या किंमतीमुळे संकटात सापडलेल्या तालुक्यातील १३४ शेतकऱ्यांनी ...

मारेगाव : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या व शेत मालाच्या पडत्या किंमतीमुळे संकटात सापडलेल्या तालुक्यातील १३४ शेतकऱ्यांनी आत्मघात करून जीवनयात्रा संपविली. गेल्या १४ वर्षांत त्यांनी आत्महत्या केल्या आहेत.गेल्या १४ वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या १३४ शेतकऱ्यांपैकी केवळ ४२ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय शासकीय मदतीस पात्र ठरले आहे. त्यांना प्रत्येकी लाखांची मदत देण्यात आली आहे. निकषात न बसल्याच्या कारणामुळे ९२ शेतकरी कुटुंब या मदतीपासून वंचित राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला केवळ एक लाखाची मदत देताना शेत मालाला योग्य भाव, कर्जमाफी, बिनव्याजी कर्ज, भारनियमनमुक्ती, सिंचनाच्या सोयी, शेतीविषयक मार्गदर्शन या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्याप सुरू असताना यावर्षी पुन्हा नापिकीने भर घातली आहे. आधी अल्पवृष्टीने शेतकऱ्यांचा घात केला. त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना हादर बसला. त्यानंतर परतीच्या पावसाने घात केला. परतीच्या पावसात पुन्हा खरीपातील पिके संकटात सापडली आहे. खरीपातील भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी रबीवर भीस्त ठेवली.मात्र रबीनेही शेवटी घातच केला. रबी पीक ऐन जोमात असताना पुन्हा पावसाने दणका दिला. ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाने रबी पिकांना फटका बसला. ऐन सवंगणीच्या काळातच वादळाने गहू आणि हरभरा पिकाला दणका दिला. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (तालुका प्रतिनिधी)