शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द; आता पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी पाठोपाठ लगेच बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नाहक अन्याय सहन करावा लागणार आहे. तर काही जणांना आनंदही झाला आहे. मात्र बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाने अद्यापही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे. याशिवाय सरसकट होणाऱ्या मूल्यांकनात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यांची क्षमता ९०टक्के गुण मिळविण्याची आहे. त्यांना कदाचित ७५ टक्के गुणांवर समाधान मानावे लागेल. तर ज्यांची क्षमता सरासरी आहे, त्यांना कदाचित प्रावीण्य श्रेणी मिळण्याची भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास येत्या काळात समाजातील शैक्षणिक गुणवत्तेबाबतच गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याचीही भीती जाणकारांकडून वर्तविली जात आहे. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना अडचणी आल्यास अनेक घरांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकष तातडीने जाहीर करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 

बारावीनंतरच्या संधी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी बारावीनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असते. फॅशन डिझायनिंग, नर्सिंग, पत्रकारिता, कायदा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बारावी परीक्षेचे गुण विचारात घेतले जातात. बारावीतील यशानुसार पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, अभियांत्रिकी, कृषी आदी विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट आदी परीक्षा देऊन अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी स्वत:ची पात्रता सिद्ध करता येते. 

 प्राचार्य, प्राध्यापक म्हणतात...

बारावीच्या भरवश्यावर विद्यार्थी उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असतात. बारावीवरच पुढचे जीवन अवलंबून असते. परीक्षा रद्द झाल्याने अडचणी येऊ शकता. या निर्णयामुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.      - प्रा. जितेंद्र जुनघरे 

सध्या करिअरच्या दृष्टीने बारावीचा निकाल तेवढासा महत्वाचा राहिलेला नाही. पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना तशाही प्रवेश परीक्षा घेतल्या जातातच. त्यात विद्यार्थी आपली पात्रता सिद्ध करू शकतात. मात्र अशा एन्टरन्स एक्झामसाठी काही अटी शासनाने शिथिल केल्या पाहिजेत. तरच सर्वांना न्याय मिळेल. - प्रा.डाॅ.रमजान विराणी

बारावीची परीक्षा रद्द झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई तसेच नीट परीक्षा द्यायची आहे, त्यांनी काय करावे ? हुशार विद्यार्थ्यांचे या निर्णयाने नुकसान केले आहे. पदवी प्रवेशासाठी अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. - साक्षी किशोर बनारसे, प्राचार्य

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा