शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावी परीक्षा रद्द; आता पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी पाठोपाठ लगेच बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नाहक अन्याय सहन करावा लागणार आहे. तर काही जणांना आनंदही झाला आहे. मात्र बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाने अद्यापही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे. याशिवाय सरसकट होणाऱ्या मूल्यांकनात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यांची क्षमता ९०टक्के गुण मिळविण्याची आहे. त्यांना कदाचित ७५ टक्के गुणांवर समाधान मानावे लागेल. तर ज्यांची क्षमता सरासरी आहे, त्यांना कदाचित प्रावीण्य श्रेणी मिळण्याची भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास येत्या काळात समाजातील शैक्षणिक गुणवत्तेबाबतच गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याचीही भीती जाणकारांकडून वर्तविली जात आहे. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना अडचणी आल्यास अनेक घरांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकष तातडीने जाहीर करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 

बारावीनंतरच्या संधी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी बारावीनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असते. फॅशन डिझायनिंग, नर्सिंग, पत्रकारिता, कायदा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बारावी परीक्षेचे गुण विचारात घेतले जातात. बारावीतील यशानुसार पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, अभियांत्रिकी, कृषी आदी विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट आदी परीक्षा देऊन अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी स्वत:ची पात्रता सिद्ध करता येते. 

 प्राचार्य, प्राध्यापक म्हणतात...

बारावीच्या भरवश्यावर विद्यार्थी उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असतात. बारावीवरच पुढचे जीवन अवलंबून असते. परीक्षा रद्द झाल्याने अडचणी येऊ शकता. या निर्णयामुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.      - प्रा. जितेंद्र जुनघरे 

सध्या करिअरच्या दृष्टीने बारावीचा निकाल तेवढासा महत्वाचा राहिलेला नाही. पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना तशाही प्रवेश परीक्षा घेतल्या जातातच. त्यात विद्यार्थी आपली पात्रता सिद्ध करू शकतात. मात्र अशा एन्टरन्स एक्झामसाठी काही अटी शासनाने शिथिल केल्या पाहिजेत. तरच सर्वांना न्याय मिळेल. - प्रा.डाॅ.रमजान विराणी

बारावीची परीक्षा रद्द झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई तसेच नीट परीक्षा द्यायची आहे, त्यांनी काय करावे ? हुशार विद्यार्थ्यांचे या निर्णयाने नुकसान केले आहे. पदवी प्रवेशासाठी अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. - साक्षी किशोर बनारसे, प्राचार्य

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा