शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

बारावी परीक्षा रद्द; आता पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी पाठोपाठ लगेच बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नाहक अन्याय सहन करावा लागणार आहे. तर काही जणांना आनंदही झाला आहे. मात्र बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाने अद्यापही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे. याशिवाय सरसकट होणाऱ्या मूल्यांकनात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यांची क्षमता ९०टक्के गुण मिळविण्याची आहे. त्यांना कदाचित ७५ टक्के गुणांवर समाधान मानावे लागेल. तर ज्यांची क्षमता सरासरी आहे, त्यांना कदाचित प्रावीण्य श्रेणी मिळण्याची भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास येत्या काळात समाजातील शैक्षणिक गुणवत्तेबाबतच गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याचीही भीती जाणकारांकडून वर्तविली जात आहे. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना अडचणी आल्यास अनेक घरांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकष तातडीने जाहीर करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 

बारावीनंतरच्या संधी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी बारावीनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असते. फॅशन डिझायनिंग, नर्सिंग, पत्रकारिता, कायदा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बारावी परीक्षेचे गुण विचारात घेतले जातात. बारावीतील यशानुसार पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, अभियांत्रिकी, कृषी आदी विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट आदी परीक्षा देऊन अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी स्वत:ची पात्रता सिद्ध करता येते. 

 प्राचार्य, प्राध्यापक म्हणतात...

बारावीच्या भरवश्यावर विद्यार्थी उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असतात. बारावीवरच पुढचे जीवन अवलंबून असते. परीक्षा रद्द झाल्याने अडचणी येऊ शकता. या निर्णयामुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.      - प्रा. जितेंद्र जुनघरे 

सध्या करिअरच्या दृष्टीने बारावीचा निकाल तेवढासा महत्वाचा राहिलेला नाही. पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना तशाही प्रवेश परीक्षा घेतल्या जातातच. त्यात विद्यार्थी आपली पात्रता सिद्ध करू शकतात. मात्र अशा एन्टरन्स एक्झामसाठी काही अटी शासनाने शिथिल केल्या पाहिजेत. तरच सर्वांना न्याय मिळेल. - प्रा.डाॅ.रमजान विराणी

बारावीची परीक्षा रद्द झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई तसेच नीट परीक्षा द्यायची आहे, त्यांनी काय करावे ? हुशार विद्यार्थ्यांचे या निर्णयाने नुकसान केले आहे. पदवी प्रवेशासाठी अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. - साक्षी किशोर बनारसे, प्राचार्य

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा