शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

परतीच्या पावसाने बसला सोयाबीनला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : परिपक्व शेंगांना फुटले कोंब, दोन लाख हेक्टरवरील पिकांवर निसर्गाची अवकृपा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठी तारांबळ उडविण्यास सुरूवात केली आहे. अपुऱ्या पावसावर मात करणारे बियाणे काही शेतकऱ्यांनी पेरले आहे. असे सोयाबीन काढणीला आले आहे. याच सुमारास परतीचा पाऊस बरसत आहे. यामुळे परिपक्व शेंगांचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ६७ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. यावर्षी हवामान खात्याने अपुरा पाऊस पडण्याचा अंदाज पेरणीपूर्वी जाहीर केला. याच अंदाजाचा धागा पकडत काही शेतकऱ्यांनी कमी पावसात हातात येणारे सोयाबीनचे वाण पेरले. अर्ली व्हेरायटी म्हणून असे वाण बाजारात प्रसिध्द आहे.प्रारंभी उशिरा आणि अपुरा पाऊस आला. यामुळे पुढे पाऊस बरसणारच नाही. अशा अंदाजात अनेक शेतकºयांनी अर्ली व्हेरायटी शेतशिवारात लावली आहे.हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना निसर्गाकडे साकडे घालण्याशिवाय पर्यायच शिल्लक नाही. शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी निसर्गाला प्रार्थना करीत आहे.काढणी आणि संरक्षण महत्त्वाचेअर्ली व्हेरायटीमधील काढणीला आलेले सोयाबीनचे पीक निरभ्र वातावरणाचा अंदाज घेऊन सोंगावे लागणार आहे. त्याच्या संरक्षणासाठी ताडपत्रीची व्यवस्था करावी लागणार आहे. तर जे पीक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे, अशा सोयाबीनच्या शेंगावर सततच्या पावसाने बुरशी पडण्याचा धोका आहे. बिजोत्पादनाचा प्लॉट असणाºया शेतकºयांनी अशा सोयाबीनवर बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामुळे त्यांचा प्लॉट फेल होणार नाही. अशा सोयाबीनची उगवणशक्ती कायम ठेवण्यास मदत होणार आहे.शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊनच अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन काढावे. तर इतर सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने तयारी करावी. त्यावर बुरशीजन्य किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.- प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती