शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने बसला सोयाबीनला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : परिपक्व शेंगांना फुटले कोंब, दोन लाख हेक्टरवरील पिकांवर निसर्गाची अवकृपा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठी तारांबळ उडविण्यास सुरूवात केली आहे. अपुऱ्या पावसावर मात करणारे बियाणे काही शेतकऱ्यांनी पेरले आहे. असे सोयाबीन काढणीला आले आहे. याच सुमारास परतीचा पाऊस बरसत आहे. यामुळे परिपक्व शेंगांचे टरफल काळे पडून शेंगातून कोंब बाहेर पडत आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ६७ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. यावर्षी हवामान खात्याने अपुरा पाऊस पडण्याचा अंदाज पेरणीपूर्वी जाहीर केला. याच अंदाजाचा धागा पकडत काही शेतकऱ्यांनी कमी पावसात हातात येणारे सोयाबीनचे वाण पेरले. अर्ली व्हेरायटी म्हणून असे वाण बाजारात प्रसिध्द आहे.प्रारंभी उशिरा आणि अपुरा पाऊस आला. यामुळे पुढे पाऊस बरसणारच नाही. अशा अंदाजात अनेक शेतकºयांनी अर्ली व्हेरायटी शेतशिवारात लावली आहे.हे सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र दररोज पाऊस बरसत आहे. यामुळे हे सोयाबीन सोंगणी करण्याचे शेतकºयांनी टाळले आहे. यामुळे उभ्या झाडांना असलेल्या शेंगामधून कोंब बाहेर येत आहे. यामुळे अशा सोयाबीनची गुणवत्ता घसरण्याचा धोका वाढला आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना निसर्गाकडे साकडे घालण्याशिवाय पर्यायच शिल्लक नाही. शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी निसर्गाला प्रार्थना करीत आहे.काढणी आणि संरक्षण महत्त्वाचेअर्ली व्हेरायटीमधील काढणीला आलेले सोयाबीनचे पीक निरभ्र वातावरणाचा अंदाज घेऊन सोंगावे लागणार आहे. त्याच्या संरक्षणासाठी ताडपत्रीची व्यवस्था करावी लागणार आहे. तर जे पीक परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे, अशा सोयाबीनच्या शेंगावर सततच्या पावसाने बुरशी पडण्याचा धोका आहे. बिजोत्पादनाचा प्लॉट असणाºया शेतकºयांनी अशा सोयाबीनवर बुरशीनाशकाची फवारणी करावी. यामुळे त्यांचा प्लॉट फेल होणार नाही. अशा सोयाबीनची उगवणशक्ती कायम ठेवण्यास मदत होणार आहे.शेतकºयांनी हवामानाचा अंदाज घेऊनच अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन काढावे. तर इतर सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी पाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने तयारी करावी. त्यावर बुरशीजन्य किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.- प्रमोद मगर, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती