शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पायउतार जिल्हा परिषद सदस्य सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 11:59 IST

Zilla Parishad members to go in Supreme Court सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च रोजीच्या निकालानुसार जिल्ह्यातील १४ जिल्हा परिषद सर्कल व १९ पंचायत समिती गणांमधील सदस्य पदांवरून पायउतार झाले. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करूनच रितसर निवडणूक लढली. यात आमचा दोष काय, असा प्रश्न उपस्थित करून संबंधित जि.प., पं.स. सदस्य लवकरच सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुषंगाने दिल्ली, मुंबईच्या वकिलांशी सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.जानेवारी २०२० मध्ये जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद सर्कल व १०४ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यात १४ जिल्हा परिषद सर्कल ओबीसी प्रवर्गाकरिता राखीव होते. दरम्यान, आसेगाव सर्कलमधून चंद्रकांत ठाकरे यांनी विजय मिळविला. यांसह कंझरा सर्कलमधून सुनीता कोठाळे, दाभा - दिलीप मोहनावाले, काटा - विजय खानझोडे, पार्डी टकमोर - सरस्वती चौधरी, उकळीपेन - चरण गोटे, कवठा - स्वप्निल सरनाईक, गोभणी - पूजा भुतेकर, भर जहागिर - उषा गरकळ, कुपटा - उमेश ठाकरे, फुलउमरी - सुनीता चव्हाण, पांगरी नवघरे - रत्नमाला उंडाळ, भामदेवी - प्रमोद लळे आणि तळप बु. सर्कलमधून शोभा गावंडे यांनी निवडणुकीत यश मिळवून जिल्हा परिषदेत ‘एण्ट्री’ केली. यातील चंद्रकांत ठाकरे हे जि.प. अध्यक्षपद; तर विजय खानझोडे आणि शोभा गावंडे या दोघांनी सभापतीपद भुषविले. अशात ४ मार्च रोजी धडकलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सर्वच सदस्यांवर पायउतार होण्याची वेळ ओढवली. राज्य निवडणूक आयोगाने ५ मार्च रोजी दिलेल्या निर्देशांचे पालन करून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व सदस्यांना नोटीस बजावून ४ मार्चपासूनच जागा रिक्त झाल्याचे जाहीर केले व तसा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची अंतिम मुदत १९ मार्च असून, पायउतार झालेल्या जिल्हा परिषद सदस्य त्यापूर्वी न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुषंगाने विविध स्वरूपातील मुद्यांवर दिल्ली व मुंबईच्या वरिष्ठ वकिलांशी सातत्याने चर्चा सुरू  असून, लवकरच न्यायालयात याचिका दाखल होणार आहे. 

निवडणूक आयोगाने काढलेल्या नोटीफिकेशनचे पालन करून तथा रिक्त जागांवरच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी निवडणूक लढली. असे असताना अचानक ओबीसींच्या जागा रिक्त ठरवून संबंधित सर्वच सदस्यांना पायउतार करण्यात आले. हा एकप्रकारे अन्याय असून, नागपूर व धुळे येथील ओबीसी सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. वाशिम जिल्ह्याची याचिकाही लवकरच न्यायालयात दाखल होईल. त्यानुषंगाने आवश्यक मुद्यांचा सारासार विचार सुरू आहे.- चंद्रकांत ठाकरेओबीसी सदस्य तथा तत्कालीन जि.प. अध्यक्ष, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSupreme Courtसर्वोच्च न्यायालयWashim ZPवाशीम जिल्हा परिषद