शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बहुपयोगी वृक्षांच्या बिया संकलित करण्यासाठी वृक्षप्रेमी युवकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 12:19 IST

सावली प्रतिष्ठानच्या २६ युवकांनी बहुपयोगी वृक्षांच्या बिया गोळा करण्याची धडपड चालविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून झाडे जगविण्याशिवाय आता इतर कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ही बाब लक्षात घेवून सावली प्रतिष्ठानच्या २६ युवकांनी बहुपयोगी वृक्षांच्या बिया गोळा करण्याची धडपड चालविली आहे. यामाध्यमातून आतापर्यंत २ हजार बियांचे संकलन देखील झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे राम धनगर यांनी दिली.सावली प्रतिष्ठानच्या युवकांनी रानावनात भटकंती करून विविध प्रजातीच्या आंब्याच्या कोयी जमा केल्या असून त्यापासून नैसर्गिक रोपे तयार केली जात आहेत. यासह डोंगरची मैना म्हणून प्रसिद्ध असलेल्या करवंदाच्याही बिया संकलित करण्यात आल्या आहेत. गतवर्षी लागवड केलेली करवंदाची झाडे माळरानावर आकार घेत आहेत, हे विशेष. इतरही बहुपयोगी वृक्षांच्या बिया संकलित करण्यात आल्या. सीडबॉल तयार करून ओसाड रानात होणार बियांचे रोपन!

सावली प्रतिष्ठानने बहुपयोगी वृक्षांच्या २ हजार बियांचे संकलन केले असून आंजन, बेल, टेंभूर्णी, चारोळी, गोधन, धामण, आंबा, करवंद आदींचा त्यात समावेश आहे. या बियांना माती आणि शेण लावून तयार झालेले सीडबॉल पहिल्या मोठ्या पावसानंतर जिल्ह्यातील ओसाड रानात लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात सावली प्रतिष्ठानशी जुळलेले २६ सदस्य पूर्ण दिमतीने कार्यरत असल्याची माहिती राम धनगर यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमenvironmentवातावरण