शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

बेरोजगारीच्या प्रश्नावरून युवक काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:10 IST

बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे.

वाशिम : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारांची संख्या वाढत असून ही बाब युवकांसाठी चिंताजनक मानली आहे. बेरोजगारीच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत युवक काँग्रेसने बेरोजगार नोंदणी अभियान हाती घेतले आहे. या अभियानात जिल्ह्यातील युवकांनी सहभागी होवून ८१५१९९४४११ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन युवक काँग्रेसचेवाशिम जिल्हाध्यक्ष बाबुराव शिंदे पाटील यांनी केले.देशातील बेरोजगारीचा प्रश्न व ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारने सीएए, एनआरसी कायदा आणला़ परंतू देशाला एनआरसीची नव्हे तर राष्ट्रीय बेरोजगारी रजिष्ट्रेशन (एनआरयु )ची गरज असल्याची मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष शिंदे यांनी केली़. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळानंतर मागील पाच ते सहा वर्षांमध्ये देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक वाढल्याची बाब राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालावरुन पुढे आली आहे, असे बाबुराव शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर ही परिस्थिती ओढावली असून या निर्णयामुळे लहानमोठे उद्योग डबघाईस आल्याने लाखो तरुणांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. ़शिवाय असंघटीत क्षेत्रातील अनेक रोजगार नष्ट झाले आहेत़  केंद्र सरकार खासगीकरणाला बळ देत असून सरकारी नोकºयांमध्ये कपातीचे धोरण राबवित आहे. कॉपोर्रेट क्षेत्रातही मंदीचे सावट असल्याने सद्यस्थितीत शेतकºयांपाठोपाठ आता बेरोजगारांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाल्यास नवल वाटायला नको, अशी टिकाही शिंदे यांनी केली. या गंभीर प्रश्नाकडे शासनकर्त्यांचे लक्ष वेधून देशातील बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी युवक काँग्रेसने एक अभियान हाती घेतले आहे. युवक काँग्रेसच्या तसेच अन्य बेरोजगार तरुण, तरुणींनी टोल फ्रि क्रमांकावर मिस कॉल देवून नोंदणी करण्याचे आवाहन बाबुराव शिंदे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस