शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

युवा शेतकरी स्वत:च उत्पादन घेऊन करताे विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 11:04 IST

Enovative Farmer  खचून न जाता देवा राऊत या युवा शेतकऱ्याने शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली.

ठळक मुद्देमातीमाेल भाव पाहता स्वत: भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला. ऑर्डर घेऊन या युवा शेतकऱ्याने उन्नती साधली आहे.

-  नंदकिशाेर नारेवाशिम  :  शेती करणे दिवसेंदिवस कठिण हाेत आहे. अशा परिस्थितीत  खचून न जाता देवा राऊत या युवा शेतकऱ्याने शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली.  ‘सेंद्रिय भाजीपाला ’ व्हाॅट्‌स ॲप ग्रुप तयार करून पिकवलेल्या मालाची स्वत: विक्री सुरू केली. हर्रासीमध्ये भाजीपाल्याला मातीमाेल भाव मिळत असल्याने त्यांने ही शक्कल  लढवून व्हाॅट्‌सॲप ग्रुपवर दरराेज उपलब्ध भाजीपाला पाेस्ट करणे व त्यावरच ऑर्डर घेऊन या युवा शेतकऱ्याने उन्नती साधली आहे.सद्यस्थितीत पिकांचे विविध संकटांमुळे हाेणारे नुकसान पाहता शेती करणे कठिण झाले आहे. परंतु, राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करून भाजीपाला उत्पादन घेतले. आधी भाजी बाजारात हर्रासीत माल नेला. परंतु, भाजीपाल्याला मिळत असलेला मातीमाेल भाव पाहता कृषी अधीक्षक शंकर ताेटावार व इतर कृषी विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्वत: भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला. त्यांनी व्हाॅट्‌सॲप ग्रुप तयार करून त्यामध्ये दरराेज उपलब्ध भाजीपाल्याची लिस्ट टाकणे सुरू केले. याला लाभलेला प्रतिसाद पाहता एका ग्रुपची सदस्य मर्यादा संपुष्टात आल्याने आता दुसरा ग्रुप तयार केला जात आहे.  या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक केले जात असून, दरराेज या ग्रुपमध्ये सकाळपासून भाजीपाला घेणाऱ्यांची यादी पाेस्ट हाेताना दिसून येत आहे.

रानभाज्यांचेही उत्पादन घेणे सुरू केले!गत एक वर्षापेक्षा जास्त दिवसापासून ग्रुपवर एकाच भाजीची यादी पाेस्ट करताना ग्राहकांनाही काही नवीन मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम हाेत असल्याचे दिसून आल्याबराेबर राऊत यांनी रानभाज्यांचे उत्पादन घेणे सुरू केले. आजच्या घडीला त्यांच्याकडे बाजारात उपलब्ध नसलेल्या रानभाज्यांसह इतर भाज्या माेठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे असलेला काही भाजीपाला जाे बाजारात सहसा मिळून येत नाही यामध्ये गुळवेल, लेटूस, मुळा शेंग, बीट, काळी मिरचीचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी