शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पीक नुकसान : ‘डाटा एन्ट्री’चे काम ८० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:45 IST

डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनाम पूर्ण झाल्यानंतर या पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २.७९ लाखांहून अधिक हेक्टर नुकसाग्रस्त क्षेत्रापैकी ८० टक्के पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची ८० टक्के अचूक डाटा एन्ट्री प्रशासनाने केली असून, आता उर्वरित २० टक्के पंचनाम्यांची डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. अंतिम अहवाल तयार करून प्रशासन ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार मदत निधीची मागणी शासनस्तरावर नोंदविणर आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यात प्रामुख्याने काढणी केलेले सोयाबीन, कपाशीसह फळपिके आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करून या नुकसानाचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विहित प्रपत्रात पंचनाम्यातील माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले.सुटीच्या दिवशीही तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह अन्य सर्व कर्मचारी तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयातील हजर राहून कर्मचाऱ्यांनी ‘डाटा एन्ट्री’चे काम केले. त्यामुळेच जिल्ह्यातील ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानाच्या पंचनाम्यांपैकी ८० टक्क्यांवर पंचनाम्यांची अचूक डाटा एन्ट्री करणे प्रशासनाला शक्य झाले.दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून, या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यासाठी बुधवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांसह पीक विमा कं पनीकडे नुकसानभरपाईच्या मागणीचा अहवाल सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कर्मचाºयांनी मंगळवारच्या सुटीलाही केले कामकाजजिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कामे ८ नोव्हेंबरअखेर पूर्ण झाली. दरम्यान, ९ नोव्हेंबरपासून ‘डाटा एन्ट्री’चे काम प्रशासनाने हाती घेतले. यादिवशी दुसरा शनिवार असल्याने सुटी होती, त्यानंतर रविवारची सुटी होती; मात्र दोन्ही दिवशी कर्मचाºयांनी कामकाज केले. यासह मंगळवारी गुरूनानक जयंतीची सुटी असतानाही कामकाज सुरू असल्याचे दिसून आले.

पीकविमा न भरणाºया शेतकºयांचा स्वतंत्र अहवालजिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना बसला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ३१५६२, रिसोड तालुक्यातील ३४२८७, मालेगाव तालुक्यातील ३०१६९, मंगरुळपीर तालुक्यातील २९२७४, मानोरा तालुक्यातील १६८४९, तर कारंजा तालुक्यातील ३२२१६ शेतकºयांचा समावेश आहे. त्यात पीक विमा भरणाºयांसह पीक विमा न भरणाºया शेतकºयांचाही समावेश आहे. पीक विमा भरणाºया शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. तर पीक विमा न भरणाºयांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारांचे स्वतंत्र अहवाल प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येत आहेत.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ८० टक्के पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ पूर्ण झाली आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर हे काम केले असून, आता उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांकडे अंतिम अहवाल बुधवार सायंकाळपर्यंत सादर करण्यात येणार आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती