शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

पीक नुकसान : ‘डाटा एन्ट्री’चे काम ८० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:45 IST

डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनाम पूर्ण झाल्यानंतर या पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २.७९ लाखांहून अधिक हेक्टर नुकसाग्रस्त क्षेत्रापैकी ८० टक्के पीक नुकसानाच्या पंचनाम्यांची ८० टक्के अचूक डाटा एन्ट्री प्रशासनाने केली असून, आता उर्वरित २० टक्के पंचनाम्यांची डाटा एन्ट्री तातडीने पूर्ण करून आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. अंतिम अहवाल तयार करून प्रशासन ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार मदत निधीची मागणी शासनस्तरावर नोंदविणर आहे.जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान अवकाळी पावसाने थैमान घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यात प्रामुख्याने काढणी केलेले सोयाबीन, कपाशीसह फळपिके आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या पथकाने युद्धपातळीवर प्रयत्न करून या नुकसानाचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर विभागीय आयुक्त आणि पिकविमा कंपन्यांकडे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विहित प्रपत्रात पंचनाम्यातील माहिती समाविष्ट करण्याचे काम सुरू करण्यात आले.सुटीच्या दिवशीही तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांसह अन्य सर्व कर्मचारी तालुका कृषी अधिकारी आणि तहसील कार्यालयातील हजर राहून कर्मचाऱ्यांनी ‘डाटा एन्ट्री’चे काम केले. त्यामुळेच जिल्ह्यातील ७९५ गावातील २ लाख ७९ हजार ९३८ हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानाच्या पंचनाम्यांपैकी ८० टक्क्यांवर पंचनाम्यांची अचूक डाटा एन्ट्री करणे प्रशासनाला शक्य झाले.दरम्यान, जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून, या शेतकºयांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यासाठी बुधवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांसह पीक विमा कं पनीकडे नुकसानभरपाईच्या मागणीचा अहवाल सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. कर्मचाºयांनी मंगळवारच्या सुटीलाही केले कामकाजजिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यांची कामे ८ नोव्हेंबरअखेर पूर्ण झाली. दरम्यान, ९ नोव्हेंबरपासून ‘डाटा एन्ट्री’चे काम प्रशासनाने हाती घेतले. यादिवशी दुसरा शनिवार असल्याने सुटी होती, त्यानंतर रविवारची सुटी होती; मात्र दोन्ही दिवशी कर्मचाºयांनी कामकाज केले. यासह मंगळवारी गुरूनानक जयंतीची सुटी असतानाही कामकाज सुरू असल्याचे दिसून आले.

पीकविमा न भरणाºया शेतकºयांचा स्वतंत्र अहवालजिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचा फटका १ लाख ७४ हजार ३५७ शेतकºयांना बसला आहे. त्यात वाशिम तालुक्यातील ३१५६२, रिसोड तालुक्यातील ३४२८७, मालेगाव तालुक्यातील ३०१६९, मंगरुळपीर तालुक्यातील २९२७४, मानोरा तालुक्यातील १६८४९, तर कारंजा तालुक्यातील ३२२१६ शेतकºयांचा समावेश आहे. त्यात पीक विमा भरणाºयांसह पीक विमा न भरणाºया शेतकºयांचाही समावेश आहे. पीक विमा भरणाºया शेतकºयांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळणार आहे. तर पीक विमा न भरणाºयांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारांचे स्वतंत्र अहवाल प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येत आहेत.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या बाधित क्षेत्रापैकी ८० टक्के पंचनाम्यांची ‘डाटा एन्ट्री’ पूर्ण झाली आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर हे काम केले असून, आता उर्वरित पंचनाम्यांची डाटा एन्ट्री करून विभागीय आयुक्तांकडे अंतिम अहवाल बुधवार सायंकाळपर्यंत सादर करण्यात येणार आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारीवाशिम

टॅग्स :washimवाशिमCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीagricultureशेती