शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

पैनगंगा नदीच्या बॅरेजेस परिसरातील विद्युत उपकेंद्रांची कामे ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:38 IST

नदीतील पाणी वापरणे शक्य होणार नसल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न उद्भवणार असल्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७१६.४२ कोटी रुपये खर्चून पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी ‘बॅरेजेस’ची कामे पूर्ण होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला; मात्र विद्यूत उपकेंद्रांची कामे संथगतीने सुरू होती. आता तर ‘लॉकडाऊन’मुळे मजूर परगावी परतल्याने ही कामे जवळपास दोन महिन्यांपासून ठप्प आहेत. परिणामी, पावसाळ्यानंतर पाणीसाठा होऊनही नदीतील पाणी वापरणे शक्य होणार नसल्याने सिंचनाचा मोठा प्रश्न उद्भवणार असल्याचे संकेत वर्तविण्यात येत आहेत.जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्यासाठी शासनाने पैनगंगा नदीवर ७१६.४२ कोटींचा निधी खर्चून बॅरेजेस उभारले. यासह बॅरेजेस परिसरात विद्यूत सुविधांचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ११ विद्यूत उपकेंद्र उभारण्याच्या कामास हिरवी झेंडी दिली. पहिल्या टप्प्यात २५ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात १३ कोटींचा निधी प्राप्त झाला. दरम्यान, डिसेंबर २०१९ अखेर नारेगाव, अनई आणि धामणी खडी येथील विद्यूत उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली. वनविभागाने उपस्थित केलेल्या जागेच्या वादामुळे एक उपकेंद्र रद्द करण्यात आले; तर उर्वरित उपकेंद्रांची कामे विविध स्वरूपातील अडचणींमुळे संथगतीने सुरू होती.तथापिख पावसाळ्यापुर्वी सर्व विद्यूत उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात कामावरील मजूर आपापल्या गावी परतल्याने कामांना पुन्हा ‘ब्रेक’ लागला असून कामे लांबणीवर पडली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. वाशिम जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेस परिसरात विद्यूत सुविधांचे भक्कम जाळे निर्माण करण्यासाठी ११ विद्यूत उपकेंद्र उभारण्यात येत आहेत. त्यापैकी चार उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून पावसाळ्यापुर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते; मात्र ‘लॉकडाऊन’मुळे मजूर उपलब्ध नसल्यानेच कामांना ‘ब्रेक’ लागला आहे.- व्ही.बी. बेथारियाअधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पmahavitaranमहावितरण