शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम अंतीम टप्प्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:27 IST

वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे.

ठळक मुद्दे नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे.

वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात मुबलक पर्जन्यमान झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याचे संकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वर्तविले आहेत.वाशिममध्ये साधारणत: गत दोन वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून एकबुर्जी या मध्यम प्रकल्पावरून नवीन पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. दरम्यान, हा वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान होऊन एकबुर्जी प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी