शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम अंतीम टप्प्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:27 IST

वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे.

ठळक मुद्दे नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे.

वाशिम : शहरातील वाढत्या लोकसंख्येला गृहित धरून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. याअंतर्गत २५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारल्या जात असून त्याचे कामही अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात मुबलक पर्जन्यमान झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याचे संकेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वर्तविले आहेत.वाशिममध्ये साधारणत: गत दोन वर्षांपासून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून एकबुर्जी या मध्यम प्रकल्पावरून नवीन पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, नव्याने नळजोडणी देण्यासह जलकुंभ उभारण्याची कामेही पूर्णत्वास गेली आहेत. मात्र, न्यायालयीन वादामुळे सर्वात मोठ्या जलकुंभाचे काम अर्धवट अवस्थेत रखडल्याने नवीन पाणीपुरवठा योजना प्रभावित झाली होती. दरम्यान, हा वाद संपुष्टात आल्यानंतर जलकुंभाचे बांधकाम झपाट्याने करण्यात आले असून ते सद्या अंतीम टप्प्यात आहे. आगामी पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान होऊन एकबुर्जी प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाल्यास वाशिमकरांची पाणी समस्या कायमची निकाली निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.के.जीवने यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी