शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात शेत मशागतीची कामे प्रलंबित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 17:13 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकºयांनी अद्याप पिकपेरणीसाठी जमिनींची मशागत करण्याची साधी तयारी देखील केलेली नाही.

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतक-यांनी अद्याप पिकपेरणीसाठी जमिनींची मशागत करण्याची साधी तयारी देखील केलेली नाही. तुरीच्या शेंगा काढून घेतल्यानंतर शिल्लक राहणा-या तुराट्या आजही अनेक शेतांमध्ये तशाच दिसून येत आहेत. तथापि, नैसर्गिक आपत्तीसह उद्भवलेल्या विविध स्वरूपातील संकटांमुळे शेतकरी अक्षरश: जेरीस आल्यानेच आगामी खरिप हंगामात पेरणीचे प्रमाण घटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.दरवर्षी साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काडी-कचरा वेचणे, वखरणी, नागरणी, कोळपणी यासह इतर स्वरूपातील शेत मशागतीची कामे सुरू होतात. यंदा मात्र जिल्ह्यातील अर्ध्याअधिक पेरणीलायक क्षेत्रावर ही कामे सुरू झालेली नाहीत. गत महिन्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे अनेक शेतक-यांच्या गहू, हरभरा व काही प्रमाणात तुरीचे अतोनात नुकसान झाले. त्यातच शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसून शासनाकडून मिळालेल्या कर्जमाफीचाही विशेष फायदा झाला नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम आगामी खरिप हंगामावर जाणवण्याची शक्यता असून जवळ पैसाच नसल्याने शेत मशागत आणि पेरणीसाठी लागणा-या साहित्यांची जुळवाजुळव कशी करणार, असा प्रश्न शेतक-यांसमोर उपस्थित झाला आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी