शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

अजगर संवर्धनासाठी वन्यजीवरक्षकांचा पुढाकार; मंगरुळपीर तालुक्यात मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:05 IST

वाशिम: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने आता अजगरांचे संवर्धन व संरक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

ठळक मुद्दे टीम मंगरुळपीरच्यावतीने मंगरुळपीर तालुक्यात ‘अजगर वाचवा’ मोहिम राबविण्यात येत आहे. वनोजा येथे २९ मार्च रोजी सकाळी ११.३० लामेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र व्यवस्थापक रेड्डी यांच्या हस्ते या मोहिमेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.वनविभागाचे सर्व अधिकारी व वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित  होते.

वाशिम: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने आता अजगरांचे संवर्धन व संरक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ‘अजगर वाचवा’ नावाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत मंगरुळपीर तालुक्यात जनजागृती करून अजगराचे महत्त्व पटवून देण्यासह या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन जनतेला करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या फलकाचे अनावरण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र व्यवस्थापक रेड्डी यांच्या हस्ते २९ मार्च रोजी वनोजा येथे करण्यात आले. 

सापांच्या जातीमधील अजगर या सापाचे जैवविविधतेतील महत्त्व अनन्य साधारण आहे. अलिकडच्या काळात दुर्मिळ होत चाललेल्या अजगराचे संरक्षण आणि संवर्धन त्यामुळेच अत्यंत गरजेचे आहे. प्रामुख्याने मोठ्या आकाराचे सरपटणारे प्राणी हे अजगराचे खाद्य असून, क्वचित हरणालाही अजगर गिळतो. हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. अजगराचे दिवसेंदिवस नष्ट होणारे अस्तित्व जैवविविधतेसाठी धोकादायक असल्याने अजगराचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या पृष्ठभूमीवर वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीम मंगरुळपीरच्यावतीने मंगरुळपीर तालुक्यात ‘अजगर वाचवा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी वनोजा येथे २९ मार्च रोजी सकाळी ११.३० लामेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र व्यवस्थापक रेड्डी यांच्या हस्ते या मोहिमेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीवरक्षक गौरव कुमार इंगळे, तसेच काटेपूर्णा अभयारण्याचे वनाधिकारी खैरनार, विशाल माळी आदिंसह वनविभागाचे सर्व अधिकारी व वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम मंगरूळपीर शाखा वनोजाचे सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित  होते. यावेळी रेड्डी यांनी टीमच्या सदस्यांसोबत संवाद साधला तसेच अजगर सापाबद्दल मार्गदर्शन केले. गौरवकुमार इंगळे यांनी अजगर वाचवा हा उपक्रम काटेपूर्णा अभयारण्याजवळील गावांत अत्यंत प्रभावीपणे, तसेच व्यापक पध्दतीने राबवण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला अतुल इंगोले, चेतन महल्ले, आकाश कांबळे, अमोल सोलव, उमेश वारेकर, सौरव इंगोले, विपुल रोकडे, आदित्य इंगोले, गजानन राऊत, दिपक कुरवाडे, वैभव गावंडे, सौरव मनवर तेजस सोनोने व गावातील आणखी युवक उपस्थित होते. 

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरwildlifeवन्यजीव