शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोरोनामुळे मंगरुळपीर येथील आठवडी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:21 IST

मंगरुळपीर : येथील दर शनिवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार काेराेना संसर्ग पाहता बंद ठेवण्यात आला हाेता. बाजारात व्यापारी, शेतकऱ्यांनी ...

मंगरुळपीर : येथील दर शनिवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार काेराेना संसर्ग पाहता बंद ठेवण्यात आला हाेता. बाजारात व्यापारी, शेतकऱ्यांनी येऊ नये याकरिता अधिकारी, कर्मचारी यांनी ठिय्या दिला हाेता.

संपूर्ण देशभरात कोरोना पसरू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत असून, महाराष्ट्रातही कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात गर्दी होऊ नये म्हणून गर्दी होणाऱ्या सर्वच घटकांवर बंदी आणण्यात आली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग लवकर होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने यात्रा, महोत्सवासह आठवडी बाजारावरही बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत.

शनिवारी शहरातील आठवडी बाजार असतो. तालुक्यातील शेतकरी, मजूर यांच्यासह शहरातील नागरिक बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने बाजाराला बंदी घातली आहे. २७ फेब्रुवारी रोजी बाजार स्थळावर सकाळपासून पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी कोणत्याच व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्यांना आपली दुकाने लावू दिली नाहीत. शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणावर भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी आणली होती. मात्र प्रशासनाने त्यांना दुकाने लावण्यास मज्जाव केला. तोडलेला भाजीपाला आणि फळे विकावीच लागणार असल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाला टेम्पो, पिकअप, हातगाडीवर ठेवून संपूर्ण शहरात गल्ली-बोळांत जाऊन भाजीपाला, फळे विकण्याचा प्रयत्न केला.