शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

जलकुंभातूनच होतोय पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:36 IST

इंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते. 

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते. इंझोरी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. आता या ठिकाणी म्हसणी येथील जीवन प्राधीकरणच्या योजनेंतर्गत पाणी पुरवठा होत असून, यासाठी जामदरा घोटी येथून मोटारपंपाद्वारे जलकुंभात पाणी सोडले जात आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गावातील लोकांना मुबलक पाणी पुरवठाही होत आहे; परंतु ही योजना राबविताना पाण्याच्या बचतीकडे दुर्लक्ष होत आहे. इंझोरी येथील जलकुंभात पाणी सोडण्यासाठी मोटारपंप सुरू केल्यानंतर ते बंद करण्याची तसदीच घेतली जात नाही. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर पाण्याचा अपव्यय सुरू होतो. जवळपास दोन ते तीन तास जलकुंभावरून पाण्याच्या धारा कोसळतच राहतात. यामुळे प्रत्येक वेळी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही ग्रामपंचायत प्रशासन, जीवन प्राधीकरण किंवा इतर संबंधित यंत्रणेकडून याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. ग्रामपंचायतींनी या समस्येवर नियंत्रणासाठी उपाय योजनांचे प्रस्तावही पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात आले आहेत, तर दुसरीकडे इंझोरी येथे अडाण प्रकल्पातील मुबलक साठ्यामुळे योग्य पाणी पुरवठा होत असतानाही प्रशासनाकडूनच त्याचा अपव्यय केला जात आहे. 

इंझोरी येथील जलकुंभातून पाण्याचा अपव्यय होत असल्याची माहितीच आपल्याला मिळाली नाही. आता याबाबत संबंधित यंत्रणेला कळवून हा प्रकार तातडीने बंद करण्याची सुचना करू.-किसन वडाळग्रामसेवक, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी