शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जलकुंभातूनच होतोय पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:36 IST

इंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते. 

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ दिवसांपासून सुरू असतानाही पाण्याचा अपव्यय टाळण्याचे प्रयत्न होत नसल्याचे दिसते. इंझोरी येथील पाणी पुरवठा योजनेचे काम गेल्या काही महिन्यांपासून करण्यात येत आहे. आता या ठिकाणी म्हसणी येथील जीवन प्राधीकरणच्या योजनेंतर्गत पाणी पुरवठा होत असून, यासाठी जामदरा घोटी येथून मोटारपंपाद्वारे जलकुंभात पाणी सोडले जात आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच ही योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे गावातील लोकांना मुबलक पाणी पुरवठाही होत आहे; परंतु ही योजना राबविताना पाण्याच्या बचतीकडे दुर्लक्ष होत आहे. इंझोरी येथील जलकुंभात पाणी सोडण्यासाठी मोटारपंप सुरू केल्यानंतर ते बंद करण्याची तसदीच घेतली जात नाही. त्यामुळे जलकुंभ भरल्यानंतर पाण्याचा अपव्यय सुरू होतो. जवळपास दोन ते तीन तास जलकुंभावरून पाण्याच्या धारा कोसळतच राहतात. यामुळे प्रत्येक वेळी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही ग्रामपंचायत प्रशासन, जीवन प्राधीकरण किंवा इतर संबंधित यंत्रणेकडून याची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्यावाचून मोठे हाल होत आहेत. ग्रामपंचायतींनी या समस्येवर नियंत्रणासाठी उपाय योजनांचे प्रस्तावही पंचायत समितीमार्फत तहसीलस्तरावर पाठविण्यात आले आहेत, तर दुसरीकडे इंझोरी येथे अडाण प्रकल्पातील मुबलक साठ्यामुळे योग्य पाणी पुरवठा होत असतानाही प्रशासनाकडूनच त्याचा अपव्यय केला जात आहे. 

इंझोरी येथील जलकुंभातून पाण्याचा अपव्यय होत असल्याची माहितीच आपल्याला मिळाली नाही. आता याबाबत संबंधित यंत्रणेला कळवून हा प्रकार तातडीने बंद करण्याची सुचना करू.-किसन वडाळग्रामसेवक, इंझोरी

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी