शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वारा प्रकल्पाचे पाणी पूस नदीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:19 IST

देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे. यामुळे चार गावांतील रब्बी पिके संकटात सापडली असून, प्रकल्पाच्या सिंचन प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडू नये, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने वारा जहॉगिर प्रकल्पाची घळभरणी झाल्यानंतर हा प्रकल्प गतवर्षीप्रमाणेच यंदाही काठोकाठ भरला आहे; परंतु या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अपूर्ण असताना प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होऊन तो ६० टक्क्यांवर आला आहे. यामुळे याच प्रकल्पावर उपसा सिंचन पद्धतीने गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी पिके संकटात सापडल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी पूस नदीत सोडण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होण्याची भितीही आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्याऐवजी कालव्याचे काम पूर्ण करून कालव्याद्वारेच पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. चार गावच्या शेतकºयांसह शिवसंग्रामचे निवेदनवारा प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडण्यात येत असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकºयांची रब्बी पिके संकटात सापडली असून, हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसंग्रामचे वाशिम-मंगरुळपीर विधानसभा अध्यक्ष महादेव उगले यांच्या नेतृत्वात चार गावच्या शेतकºयांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. प्रकल्पातील पाणी पूस नदीत सोडणे त्वरीत बंद न केल्यास शिवसंग्राम आणि शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. 

 

वारा जहॉगिर प्रकल्पात सद्यस्थितीत ६७ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाच्या खालच्या भागातील शेतकºयांना पाणीकर घेऊन चार वेळा पाणी देण्यात येणार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. त्यापैकी तीन वेळा पाणी सोडण्यात आले असून, आणखी एक वेळा पाणी सोडण्यात येणार आहे. ही पाळी झाल्यानंतर त्यांना पाणी सोडले जाणार नाही. -शिवाजीराव जाधव, कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमDamधरणriverनदी