शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

वारा प्रकल्पाचे पाणी पूस नदीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:19 IST

देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे. यामुळे चार गावांतील रब्बी पिके संकटात सापडली असून, प्रकल्पाच्या सिंचन प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडू नये, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने वारा जहॉगिर प्रकल्पाची घळभरणी झाल्यानंतर हा प्रकल्प गतवर्षीप्रमाणेच यंदाही काठोकाठ भरला आहे; परंतु या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अपूर्ण असताना प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होऊन तो ६० टक्क्यांवर आला आहे. यामुळे याच प्रकल्पावर उपसा सिंचन पद्धतीने गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी पिके संकटात सापडल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी पूस नदीत सोडण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होण्याची भितीही आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्याऐवजी कालव्याचे काम पूर्ण करून कालव्याद्वारेच पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. चार गावच्या शेतकºयांसह शिवसंग्रामचे निवेदनवारा प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडण्यात येत असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकºयांची रब्बी पिके संकटात सापडली असून, हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसंग्रामचे वाशिम-मंगरुळपीर विधानसभा अध्यक्ष महादेव उगले यांच्या नेतृत्वात चार गावच्या शेतकºयांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. प्रकल्पातील पाणी पूस नदीत सोडणे त्वरीत बंद न केल्यास शिवसंग्राम आणि शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. 

 

वारा जहॉगिर प्रकल्पात सद्यस्थितीत ६७ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाच्या खालच्या भागातील शेतकºयांना पाणीकर घेऊन चार वेळा पाणी देण्यात येणार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. त्यापैकी तीन वेळा पाणी सोडण्यात आले असून, आणखी एक वेळा पाणी सोडण्यात येणार आहे. ही पाळी झाल्यानंतर त्यांना पाणी सोडले जाणार नाही. -शिवाजीराव जाधव, कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमDamधरणriverनदी