शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांची अंमलबजावणी धिम्या गतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:52 IST

वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यापासून जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असताना अद्याप त्यावर मात करण्यासाठी कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. गावागावातील ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.  पशूपक्षी आणि जनावरांवरही पाणीटंचाईचे संकट कोसळले असून संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.

वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे प्रश्न निकाली निघण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.

वाशिम जिल्ह्यात यंदा ५१० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार, असे गृहित धरून जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्येच ५७८ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला होता. त्यानुसार टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना, नळ योजना दुरूस्ती आदींसाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र मार्च महिन्यापासून जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असताना अद्याप त्यावर मात करण्यासाठी कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. म्हणायला, काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, तो नित्यनेम नसल्याने गावागावातील ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. 

दुसरीकडे पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी, पशूपक्षी आणि जनावरांवरही पाणीटंचाईचे संकट कोसळले असून संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने पणीटंचाई कृती आराखड्याची चोख अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीWashim ZPवाशीम जिल्हा परिषद