शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई उपाययोजनांची अंमलबजावणी धिम्या गतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:52 IST

वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे.

ठळक मुद्देमार्च महिन्यापासून जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असताना अद्याप त्यावर मात करण्यासाठी कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. गावागावातील ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे.  पशूपक्षी आणि जनावरांवरही पाणीटंचाईचे संकट कोसळले असून संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.

वाशिम : जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना प्रशासकीय पातळीवरून पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या कृती आराखड्यानुसार उपाययोजनांची अंमलबजावणी अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे प्रश्न निकाली निघण्याऐवजी अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे.

वाशिम जिल्ह्यात यंदा ५१० गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार, असे गृहित धरून जिल्हा प्रशासनाने डिसेंबर २०१७ मध्येच ५७८ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला होता. त्यानुसार टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरती पुरक पाणीपुरवठा योजना, नळ योजना दुरूस्ती आदींसाठी ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र मार्च महिन्यापासून जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई उद्भवली असताना अद्याप त्यावर मात करण्यासाठी कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. म्हणायला, काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, तो नित्यनेम नसल्याने गावागावातील ग्रामस्थांची विशेषत: महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. 

दुसरीकडे पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राणी, पशूपक्षी आणि जनावरांवरही पाणीटंचाईचे संकट कोसळले असून संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने पणीटंचाई कृती आराखड्याची चोख अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीWashim ZPवाशीम जिल्हा परिषद