शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अखेर राजूरा गावात पोहचले पाण्याचे टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 6:26 PM

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले  नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले  नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले.राजूरा येथे दरवर्षी तिव्र पाणीटंचाई निर्माण होते. परिसरातील जलस्त्रोत आटल्याने गावकºयांना दूरवरून पाणी आणण्याची कसरत करावी लागते. राजूरा येथील पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामपंचायतसह गावकºयांनी वारंवार वरिष्ठ प्रशासनाकडे केली आहे. मात्र, अद्याप या मागणीची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, गावकºयांना उन्हाळ्यात पाण्यासाठी दाहिदिशा भटकंती करावी लागते. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर स्वरुपाचा होऊन जातो. यावर्षीदेखील राजूरा येथील तिव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. उन्हाळ्याला सुरूवात होताच, तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. तेव्हापासून १५ मे पर्यंत गावकºयांना पाण्यासाठी पायपिट करावी लागली. १७ मे रोजी टँकरच्या प्रस्तावाला वरिष्ठ स्तरावर मंजूरी मिळाल्याने गावात टँकरचे पाणी येईल, या आशेवर असलेल्या गावकºयांचा पुरता भ्रमनिरास झाला. टँकर मंजूर असतानाही गावात टँकर पोहचले नसल्यासंदर्भात लोकमतने २० मे तसेच २६ मे रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत २६ मे रोजी राजूरा येथे पाण्याचे टँकर पोहचलेआहे. गावातील विहिरीत पाणी सोडण्यात आले असून, येथून गावकºयांनी पाणी भरले. टँकरच्या फेºया नियमित सुरू ठेवाव्या, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई